Homeराजकीयभुसावळमध्ये राजकीय वातावरण तापलं ; नगराध्यक्षा गायत्री भंगाळे यांचे भाजपवर गंभीर आरोप

भुसावळमध्ये राजकीय वातावरण तापलं ; नगराध्यक्षा गायत्री भंगाळे यांचे भाजपवर गंभीर आरोप

भुसावळ : शहराच्या विकासाच्या मुद्द्यावरून भुसावळमध्ये राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. नगराध्यक्षा गायत्री भंगाळे यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपच्या नगरसेवकांवर गंभीर आरोप केले आहेत. शहराच्या विकासकामांना मुद्दाम अडथळे निर्माण केले जात असल्याचा थेट आरोप त्यांनी यावेळी केला.

पत्रकार परिषदेत बोलताना भंगाळे म्हणाल्या की, नगरपालिकेच्या बैठकीत वारंवार गोंधळ घालून कामकाजात अडथळे आणले जात आहेत. माईक हिसकावून घेणे, निर्णय प्रक्रियेत अडथळे निर्माण करणे अशा प्रकारच्या घटना घडत असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच, “मी सामान्य कुटुंबातील महिला असल्यामुळे मला जाणीवपूर्वक त्रास दिला जात आहे,” असा गंभीर आरोपही त्यांनी केला.

शहराच्या विकासासाठी आपण विविध मंत्र्यांकडे सातत्याने पाठपुरावा करत असल्याचे सांगत, त्यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्याशी झालेल्या चर्चेचाही उल्लेख केला. जनतेच्या आशीर्वादाने विकासकामे पुढे नेत राहणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी नगरसेवक सचिन चौधरी यांनीही भाजपवर टीका करत, भुसावळचा खरा विकास संतोष चौधरी यांच्या कार्यकाळात झाल्याचा दावा केला. तर उल्हास पगारे यांनी भाजपच्या नगरसेवकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रारी करून विकासकामे थांबवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला.
दरम्यान, या राजकीय आरोप-प्रत्यारोपांमुळे भुसावळच्या विकासकामांवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नागरिकांच्या दृष्टीने हा वाद थांबून प्रत्यक्ष विकासकामांना गती मिळणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

जल गंगा संवर्धन अभियान

0
प्रभारी मंत्री श्री सिलावट ने किया हसनपुरा तालाब गहरीकरण कार्य का शुभारंभ प्रभारी मंत्री श्री तुलसीराम सिलावट ने ग्रामीणजनों के बीच बैठकर किया संवाद बुरहानपुर/18 अप्रैल,...

भुसावळमध्ये जात प्रमाणपत्रावरून आरोप-प्रत्यारोप ; प्रकरण व्हिजिलन्स समितीकडे

0
भुसावळ - नगरपालिकेच्या राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गटाच्या नगराध्यक्षा गायत्री गौर यांनी वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे व त्यांच्या पत्नी रजनी सावकरे यांच्यावर आरोप केल्याची...

ओव्हरलोड राख भरण्यावरून वाद ; धमकी व मारहाणीचा गुन्हा दाखल

0
भुसावळ - तालुक्यातील दिपनगर परिसरात ओव्हरलोड राख भरण्याच्या वादातून शिवीगाळ, धमकी व मारहाणीची घटना घडल्याची तक्रार भुसावळ तालुका पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे....

भुसावळात भट्टीजवळ उभी रिक्षा पेटली; मोठे नुकसान, सुदैवाने जीवितहानी टळली

0
भुसावळ - शहरातील जामनेर रोडवरील शेठ घासीलाल अँड सन्स या दुकानासमोर उभी असलेली रिक्षा अचानक पेट घेतल्याची घटना घडली. या आगीत रिक्षेचे मोठ्या प्रमाणात नुकसान...

भुसावळात ‘अमृत’ योजनेचा घोटाळा? नगराध्यक्षांचा संताप उसळला ; ठेकेदारांवर कारवाईची मागणी

0
८-१० वर्षे रखडलेली पाणी योजना , खर्च ९० कोटींवरून १३५ कोटींवर; नागरिकांना पाण्यासाठी हाल भुसावळ : शहरातील पाणीपुरवठा आणि विकासकामांच्या रखडलेल्या प्रश्नांवरून भुसावळच्या नगराध्यक्ष गायत्री...

जल गंगा संवर्धन अभियान

0
प्रभारी मंत्री श्री सिलावट ने किया हसनपुरा तालाब गहरीकरण कार्य का शुभारंभ प्रभारी मंत्री श्री तुलसीराम सिलावट ने ग्रामीणजनों के बीच बैठकर किया संवाद बुरहानपुर/18 अप्रैल,...

भुसावळमध्ये जात प्रमाणपत्रावरून आरोप-प्रत्यारोप ; प्रकरण व्हिजिलन्स समितीकडे

0
भुसावळ - नगरपालिकेच्या राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गटाच्या नगराध्यक्षा गायत्री गौर यांनी वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे व त्यांच्या पत्नी रजनी सावकरे यांच्यावर आरोप केल्याची...

ओव्हरलोड राख भरण्यावरून वाद ; धमकी व मारहाणीचा गुन्हा दाखल

0
भुसावळ - तालुक्यातील दिपनगर परिसरात ओव्हरलोड राख भरण्याच्या वादातून शिवीगाळ, धमकी व मारहाणीची घटना घडल्याची तक्रार भुसावळ तालुका पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे....

भुसावळात भट्टीजवळ उभी रिक्षा पेटली; मोठे नुकसान, सुदैवाने जीवितहानी टळली

0
भुसावळ - शहरातील जामनेर रोडवरील शेठ घासीलाल अँड सन्स या दुकानासमोर उभी असलेली रिक्षा अचानक पेट घेतल्याची घटना घडली. या आगीत रिक्षेचे मोठ्या प्रमाणात नुकसान...

भुसावळात ‘अमृत’ योजनेचा घोटाळा? नगराध्यक्षांचा संताप उसळला ; ठेकेदारांवर कारवाईची मागणी

0
८-१० वर्षे रखडलेली पाणी योजना , खर्च ९० कोटींवरून १३५ कोटींवर; नागरिकांना पाण्यासाठी हाल भुसावळ : शहरातील पाणीपुरवठा आणि विकासकामांच्या रखडलेल्या प्रश्नांवरून भुसावळच्या नगराध्यक्ष गायत्री...
error: Content is protected !!