नांदगाव पंचायत समिती पशुसंवर्धन विकास अधिकारी डॉ ताठे यांना निवेदन देऊन लंपीसारख्या संसर्गावर उपाययोजना करण्याची विनंती..
पोलीस वार्ता, मनमाड : प्राण्यांच्या कल्याणासाठी आणि त्यांचे संरक्षण करण्यासाठी प्रतिनिधी म्हणून काम करणारे महाराष्ट्र शासन प्राणी कल्याण कायदा सनियंत्रण समितीचे ‘मानद प्राणी कल्याण अधिकारी’ सतीश रत्नसिंह परदेशी यांनी नांदगाव येथील पंचायत समिती पशुसंवर्धन विकास अधिकारी डॉ.एन.टी. ताठे यांना निवेदन देऊन लंपीसारख्या संसर्गजन्य आजाराची उपाययोजना भटक्या गाई आणि गरजू आजारी जनावरांवर इतर वैद्यकीय उपचार करण्याची विनंती या निवेदनाद्वारे केली आहे.
ज्या गाई जनावरांमध्ये लंपीसारख्या आजाराची लक्षणे आढळली आहेत, त्या गाईंचा बंदोबस्त विलगीकरण कक्षामध्ये करून तातडीने त्यांचा उपचार सुरू करावे. तसेच मनमाड शहरातील भटक्या गाईंमध्ये हा आजार पसरणार नाही यादृष्टीने निर्देश देऊन उपाय करावे आणि नगरपरिषद व पंचायत समिती यांनी संयुक्तपणे अशा उपाययोजना कायम ठेवाव्या. असे विषय निवेदनात असून पशुसंवर्धन विकास अधिकारी यांनी देखील त्वरित नोंद घेऊन संबंधित प्रकरण स्थानिक पशुसंवर्धन मंडळ अधिकारी सौ.डॉ.दीपाली खवसे यांच्याकडे पाठवले आहे आणि त्यांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून देत, गरजू आजारी जनावरांवर योग्य उपचार करून, प्राणी क्रूरता घडू नये यासाठी उपायोजना करण्याच्या सूचना दिल्या आहे. यामुळे लंपीसारख्या आजाराला प्रतिबंधित करण्यास मदत होईल.
भुसावळ - तालुक्यातील दिपनगर परिसरात ओव्हरलोड राख भरण्याच्या वादातून शिवीगाळ, धमकी व मारहाणीची घटना घडल्याची तक्रार भुसावळ तालुका पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे....
भुसावळ - शहरातील जामनेर रोडवरील शेठ घासीलाल अँड सन्स या दुकानासमोर उभी असलेली रिक्षा अचानक पेट घेतल्याची घटना घडली. या आगीत रिक्षेचे मोठ्या प्रमाणात नुकसान...
८-१० वर्षे रखडलेली पाणी योजना , खर्च ९० कोटींवरून १३५ कोटींवर; नागरिकांना पाण्यासाठी हाल
भुसावळ : शहरातील पाणीपुरवठा आणि विकासकामांच्या रखडलेल्या प्रश्नांवरून भुसावळच्या नगराध्यक्ष गायत्री...
भुसावळ - तालुक्यातील दिपनगर परिसरात ओव्हरलोड राख भरण्याच्या वादातून शिवीगाळ, धमकी व मारहाणीची घटना घडल्याची तक्रार भुसावळ तालुका पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे....
भुसावळ - शहरातील जामनेर रोडवरील शेठ घासीलाल अँड सन्स या दुकानासमोर उभी असलेली रिक्षा अचानक पेट घेतल्याची घटना घडली. या आगीत रिक्षेचे मोठ्या प्रमाणात नुकसान...
८-१० वर्षे रखडलेली पाणी योजना , खर्च ९० कोटींवरून १३५ कोटींवर; नागरिकांना पाण्यासाठी हाल
भुसावळ : शहरातील पाणीपुरवठा आणि विकासकामांच्या रखडलेल्या प्रश्नांवरून भुसावळच्या नगराध्यक्ष गायत्री...