Homeआरोग्यडॉ आंबेडकर विद्यार्थी आश्रमाला 'प्रेरणाभूमी' आणि 'राष्ट्रीय स्मारक' म्हणून घोषित करावे!

डॉ आंबेडकर विद्यार्थी आश्रमाला ‘प्रेरणाभूमी’ आणि ‘राष्ट्रीय स्मारक’ म्हणून घोषित करावे!

स्वतः डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी 17 डिसेंबर 1951 साली मनमाड येथील आश्रमाचे भूमिपूजन आणि उद्घाटन केले होते..

पोलीस वार्ता, मनमाड : महाराष्ट्राच्या भूमीत महामानव भारतरत्न ‘भीमराव रावजी आंबेडकर’ म्हणजे संविधान निर्माते ‘डॉ.बाबासाहेब आंबेडकर’ यांनी ज्या-ज्या स्थळी भेट दिली, आंदोलने केली, वास्तव्य केले आहे. तसेच त्यांच्या उपस्थितीने जो भाग व जागा स्पर्श होऊन गेला आहे. हे सर्व प्रसंग आंबेडकरी अनुयायांच्या जिवाळीचे असून यासर्व स्थळांचा, जागेंचा वारसा जपण्यासाठी राज्य सरकारने पुढाकार घेऊन त्यांचा विकास करावा व त्यांना राष्ट्रीय स्मारक म्हणून दर्जा द्यावा अशी मागणी समस्त आंबेडकर अनुयायांकडून होताना वारंवार दिसत आहे.
त्याचाच एक ऐतिहासिक प्रसंग म्हणजे, महाराष्ट्रातील मनमाड शहरात असलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी आश्रम हे कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांनी स्थापन केलेल्या दत्तात्रय शिक्षण प्रसारक मंडळातर्फे चालवले जाते. या आश्रमाचे विशेष म्हणजे स्वतः डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी 17 डिसेंबर 1951 साली या आश्रमाचे भूमिपूजन आणि उद्घाटन केले होते. शहरात या आश्रमाला ‘प्रेरणाभूमी’ म्हणून ओळखले जाते. हाच दर्जा ‘राष्ट्रीय स्तरावर’ मिळावा यासाठी मनमाड शहरातील आंबेडकरी समाज बांधव व सर्व राजकीय पुढारी हे जोर देत आहे.
प्रमुख म्हणजे मनमाड शहराचा इतिहास आंबेडकरी चळवळीशी जोडलेला गेला आहे, कारण डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी 12 आणि 13 फेब्रुवारी 1938 मध्ये ‘जीआयपी रेल्वे डिप्रेस्ड क्लास कामगार परिषदेचे’ अध्यक्ष म्हणून मनमाड येथे भाषण केले होते, या शहरात रेल्वेच्या दलित कामगारांची परिषद घेऊन त्यांच्या हक्कांसाठी एक महत्त्वपूर्ण आवाहन केले होते, या घटनेने मनमाडच्या आंबेडकरी चळवळीला एक नवी दिशा दिली आणि या शहराला दलित कामगारांच्या चळवळीचे एक महत्त्वाचे केंद्र बनवले. त्यांच्यावरील अत्याचारांबद्दल आवाज उठवला होता. हा दौरा मनमाड शहरातील दलित चळवळीच्या इतिहासातील एक महत्त्वाचा भाग आहे.
2025 मध्ये मनमाड शहरातील डॉ.आंबेडकर विद्यार्थी आश्रमाला  “प्रेरणाभूमी” म्हणून घोषित करणे तसेच या स्थळाला ‘राष्ट्रीय स्मारक’ म्हणून दर्जा देणे, याठिकाणी आंतरराष्ट्रीय ज्ञान संकुल उभारणे आणि ’17 नोव्हेंबर’ हा दिवस “प्रेरणादिन” म्हणून साजरा करण्यास मान्यता देणे यासाठी मनमाड येथील मा.नगराध्यक्ष रवींद्र घोडेस्वार, मा.नगरसेवक संतोष आहिरे, समाजसेवक विलास कटारे, संजय निकम, दिपक साळवे, सुनील साळवे यांच्या शिष्टमंडळाने महा.राज्य विधानसभेचे उपाध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस आमदार मा.श्री अण्णा बनसोडे यांची मुंबई येथे भेट घेऊन, निवेदन देऊन, चर्चा केली व स्मारकाच्या संदर्भात प्रस्ताव सादर केला.
शासन सकारात्मक असून ‘राष्ट्रीय दर्जा’ देण्याबाबत लवकरच विचार केला जाईल. असे सांगत, महा.राज्य विधानसभा उपाध्यक्ष मा.आ. अण्णा बनसोडे 17 नोव्हेंबर 2025 रोजी स्वतः मनमाड शहरात स्मारकाला भेट घेण्यासाठी येणार आहे. यावेळी दौऱ्यात संबंधित शासकीय विभागांचे अधिकारी, प्रेरणाभूमी विकास कृती समितीचे सदस्य, तसेच व्यवस्थापन प्रतिनिधी यांच्यासोबत ते चर्चा करून पुढील निर्णय व आदेश देणार आहे. विशेष म्हणजे ’17 नोव्हेंबर’ हा दिवस दरवर्षी “प्रेरणादिन” म्हणून साजरा केला जातो. त्याच अनुषंगाने हा दौरा नियोजित करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
मनमाड शहरात गेल्या बऱ्याच दिवसांपासून या मागणीसाठी प्रेरणाभूमी विकास कृती समितीला विविध सामाजिक संघटना व क्षेत्रातील लोकांचे योगदान मिळाले. ज्यातून एक भव्य आंदोलन उभे करता आले. त्यातून लोकांपर्यंत ही मागणी पोहोचत आली. आता या आंदोलनाची दखल सरकार घेत असून तसे संकेत मुंबईत झालेल्या बैठकीतून दिसत आहे. या ऐतिहासिक निर्णयामुळे मनमाडच्या सामाजिक आणि शैक्षणिक विकासाला नवी दिशा मिळणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अक्षय तृतीया पर उड़ान लिनेस क्लब बुरहानपुर की सराहनीय पहल : वृद्ध आश्रम में...

0
रमाकांत मोरे बुरहानपुर | अक्षय तृतीया के पावन अवसर पर, जहाँ समाज में लोग सोना-चांदी और भौतिक वस्तुओं की खरीदारी में व्यस्त हैं, वहीं उड़ान...

भुसावळच्या विकासासाठी सत्ताधारी-विरोधकांनी एकत्र यावे – उमेश नेमाडे

0
भुसावळ : नगरपालिकेतील सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे जिल्हाध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे यांनी दोन्ही...

भुसावळात इसमावर चाकू हल्ला; एक जखमी, उपचार सुरू

0
ब्रेकिंग न्यूज | भुसावळ (ता. १९ एप्रिल) : शहरात रविवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास एका इसमावर अज्ञात व्यक्तीने छातीत चाकूने वार केल्याची धक्कादायक घटना घडली....

राज्यात ढगाळ हवामान, मेघगर्जनेसह वादळी पाऊस, कृषी विभागाचा शेतकऱ्यांना सतर्कता इशारा!

संभाव्य हवामान बदल लक्षात घेऊन योग्य ते प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना आवाहन.. पोलीस वार्ता, मुंबई : राज्यात पश्चिम भागात, घाट परिसर, खानदेश, मराठवाडा...

सोशल मीडियावर कोणतीही अफवा शेअर करताना खबरदारी बाळगावी -नाशिक पोलीस!

महिला छळ प्रकरणात पोलिसांनी तात्काळ व कठोर कारवाई केली असून नागरिक, माध्यमांकडून मिळालेल्या प्रतिसादाबद्दल पोलिसांनी आभार व्यक्त केले.. पोलीस वार्ता, नाशिक : शहरात घडलेल्या एका...

अक्षय तृतीया पर उड़ान लिनेस क्लब बुरहानपुर की सराहनीय पहल : वृद्ध आश्रम में...

0
रमाकांत मोरे बुरहानपुर | अक्षय तृतीया के पावन अवसर पर, जहाँ समाज में लोग सोना-चांदी और भौतिक वस्तुओं की खरीदारी में व्यस्त हैं, वहीं उड़ान...

भुसावळच्या विकासासाठी सत्ताधारी-विरोधकांनी एकत्र यावे – उमेश नेमाडे

0
भुसावळ : नगरपालिकेतील सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे जिल्हाध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे यांनी दोन्ही...

भुसावळात इसमावर चाकू हल्ला; एक जखमी, उपचार सुरू

0
ब्रेकिंग न्यूज | भुसावळ (ता. १९ एप्रिल) : शहरात रविवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास एका इसमावर अज्ञात व्यक्तीने छातीत चाकूने वार केल्याची धक्कादायक घटना घडली....

राज्यात ढगाळ हवामान, मेघगर्जनेसह वादळी पाऊस, कृषी विभागाचा शेतकऱ्यांना सतर्कता इशारा!

संभाव्य हवामान बदल लक्षात घेऊन योग्य ते प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना आवाहन.. पोलीस वार्ता, मुंबई : राज्यात पश्चिम भागात, घाट परिसर, खानदेश, मराठवाडा...

सोशल मीडियावर कोणतीही अफवा शेअर करताना खबरदारी बाळगावी -नाशिक पोलीस!

महिला छळ प्रकरणात पोलिसांनी तात्काळ व कठोर कारवाई केली असून नागरिक, माध्यमांकडून मिळालेल्या प्रतिसादाबद्दल पोलिसांनी आभार व्यक्त केले.. पोलीस वार्ता, नाशिक : शहरात घडलेल्या एका...
error: Content is protected !!