जिल्हाधिकारी प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली पाणीपुरवठा, स्वच्छता व भूमिगत गटार योजनेंतर्गत सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्याच्या पुनर्वापराबाबत बैठक..
पोलीस वार्ता, नाशिक : जिल्ह्यातील नगरपरिषदा, नगरपंचायती आणि मालेगाव महानगरपालिकेने पाण्याची मागणी व सांडपाणी व्यवस्थापनाबाबत सविस्तर प्रकल्प अहवाल सादर करावेत, अशी सूचना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केली.
जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात जिल्हाधिकारी प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली पाणीपुरवठा, स्वच्छता व भूमिगत गटार योजनेंतर्गत सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्याच्या पुनर्वापराबाबत बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्त मनीषा खत्री, जिल्हा सहआयुक्त श्याम गोसावी (नगरपरिषद प्रशासन), जागतिक बँकेच्या तांत्रिक पथकातील सदस्य, जिल्ह्यातील सर्व नगरपरिषदांचे मुख्याधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी प्रसाद यांनी सांगितले की, महाराष्ट्र शहरी पाणीपुरवठा स्वच्छता पुनर्वापर कार्यक्रम हा राज्य शासनाचा सहा हजार कोटी रुपयांचा प्रकल्प जागतिक बँकेच्या साहाय्याने राबविला जाणार आहे. सांडपाणी व्यवस्थापन, पुनर्वापर आणि संसाधन पुनर्प्राप्तीकरीता जिल्ह्यातील 17 नगरपरिषदा, नगरपंचायती, महानगरपालिकांचे आर्थिक स्थैर्य व पर्यावरणीय परिणाम सुधारण्यासाठी शहरी पाणी व्यवस्थापन लवचिक आणि कार्यक्षम बनविण्यात येणार आहे. त्यासाठी सांडपाणी प्रक्रियेनंतर पाण्याच्या पुनर्वापराबाबतचे नियोजन करावे. सर्व नागरी भागांमध्ये स्वच्छ सर्वेक्षणाचे नियोजन, कचरा स्थळे निश्चित करून ते स्वच्छ करणे तसेच सुशोभीकरण करावे. तसेच स्वच्छ सर्वेक्षण 2025 स्पर्धेत मानांकन उंचावण्यासाठी सर्व नगरपरिषदांनी प्रयत्न करावेत, अशाही सूचना त्यांनी केल्या.
पीएम सूर्यघर योजनेंतर्गत शहरी भागातील सर्व घरांना या योजनेचा दोन महिन्यांत लाभ देण्यासाठी नियोजन करावे. तसेच मुख्याधिकाऱ्यांनी क्षेत्रीय भेटी देत नागरी समस्यांचे निराकरण करावे, अशाही सूचना त्यांनी दिल्या. यावेळी जिल्हाधिकारी प्रसाद यांनी जिल्ह्यातील 11 नगरपरिषदांच्या निवडणूक कामाचा सविस्तर आढावा घेतला.
कानूनी अधिकार, साइबर सुरक्षा व लैंगिक समानता पर जागरूकता
( गणेश सोलंकी ) छात्राओं को मिला मार्गदर्शन व आत्मविश्वास
खरगोन 16 अप्रैल 2026। “नारी शक्ति वंदन...
सातारा (मीनाक्षी पोळ उंब्रज) : कराड तालुक्यातील तासवडे एमआयडीसीतील भीषण स्फोट प्रकरणाला आता नवे वळण मिळाले असून, अमोल सुभाष कांबळे यांच्या तक्रारीनंतर उच्चस्तरीय चौकशीचे...
कानूनी अधिकार, साइबर सुरक्षा व लैंगिक समानता पर जागरूकता
( गणेश सोलंकी ) छात्राओं को मिला मार्गदर्शन व आत्मविश्वास
खरगोन 16 अप्रैल 2026। “नारी शक्ति वंदन...
सातारा (मीनाक्षी पोळ उंब्रज) : कराड तालुक्यातील तासवडे एमआयडीसीतील भीषण स्फोट प्रकरणाला आता नवे वळण मिळाले असून, अमोल सुभाष कांबळे यांच्या तक्रारीनंतर उच्चस्तरीय चौकशीचे...