पावसाळा सुरू होण्यापूर्वी गिरणा धरणात साधारण 21 टक्केच पाणीसाठा शिल्लक राहिला होता..

पोलीस वार्ता, मालेगाव : उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण तसेच खान्देश प्रदेशासाठी महत्त्वाचे असलेल्या गिरणा धरणाच्या (Girna Dam) पाणीसाठ्यात कमालीची वाढ होत असून नाशिक व जळगाव जिल्ह्यातील चालू असलेल्या जोरात पावसामुळे धरणातील पाणीसाठा शनिवार, दि.5 जुलै 2025 रोजी सायकाळपर्यंत 19 टक्क्यांनी वाढला आहे. आतापर्यंत एकूण 39.66 टक्के जलसाठा साठला आहे. अशी माहिती गिरणा पाठबंधारे विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून मिळाली आहे.

पावसाळा सुरू होण्यापूर्वी गिरणा धरणात साधारण 21 टक्केच पाणीसाठा शिल्लक राहिला होता. आता धरणात पावसाच्या पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात सुरू झाली आहे.

गिरणा धरणावर अवलंबून असलेल्या मालेगाव, नांदगाव तसेच ग्रामीण भागाचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटेल तसेच धरणातील पाण्याचा विसर्ग झाल्याने जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव, एरंडोल, धरणगाव, भडगाव, पाचोरा या तालुक्यासह नदीकाठचे गावे गिरणा नदीवर पिण्याच्या व शेतीच्या पाण्यासाठी अवलंबून आहे.




































