दिवसेंदिवस तापमान वाढते आहे, हवामान बदलासारख्या या समस्यांवर मात करण्यासाठी वृक्षारोपण करणे आवश्यक आहे..
पोलीस वार्ता, नाशिक : वृक्षारोपण ही काळाची गरज आहे, कारण पर्यावरणाचा वाढता ऱ्हास आणि वातावरणीय ऋतूत झालेले मोठे बदल याचेच सूचक उदाहरण आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण हा उत्तम आणि सोपा पर्याय आहे. वाढत्या शहरीकरण आणि औद्योगिक प्रदूषणामुळे पर्यावरणावर खूप वाईट परिणाम झाले आहेत. यामुळे दिवसेंदिवस तापमान वाढते आहे. हवामान बदलासारख्या या समस्यांवर मात करण्यासाठी वृक्षारोपण करणे आवश्यक आहे. अचानक थंडी, उष्णता, पाऊस, वादळे यासारखे नैसर्गिक आपत्तीजनक संकटे येत आहेत. अश्या वेळी पृथ्वीचा समतोल टिकून राहावा आणि मानवी जीवन असेच सुखरूप चालू राहावे यासाठी जास्तीत जास्त वृक्षारोपण करून त्यांचे संवर्धन-संरक्षण करणे हे आज प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे.
याच अनुषंगाने हरित महाराष्ट्र ‘समृद्ध महाराष्ट्र’ अभियानांतर्गत नाशिक शहरातील न्यू ग्रेस इंग्लिश मीडियम स्कूल येथे गुरुवारी दि.17 जुलै 2025 रोजी वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला. शाळेचे शिक्षक, कर्मचारी, यांनी मिळून वृक्षारोपण केले. प्रिन्सिपल स्मिता मुजुमदार आणि राजश्री मॅडम यांच्या हस्ते प्रथम वृक्षरोपण करून सुरुवात करण्यात आली. यावेळी जयश्री जाधव, निर्मला दाणी, प्रेसिडेंट राजश्री मॅडम, वैशाली पाटील, अश्विनी जाधव, रेखा तायडे, पुनम मोरे आदी महिला शिक्षक उपस्थित होते.





























