एकूण 21 जागांपैकी तब्बल 20 जागांवर विजय मिळवत ‘निळकंठेश्वर पॅनल’ने विरोधकांना पराभूत केलं आहे..

पोलीस वार्ता, पुणे : बारामतीच्या राजकारणात आणि सहकारी क्षेत्रात मोठा भूकंप घडवणाऱ्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या नेतृत्वाखालील ‘निळकंठेश्वर पॅनल’ने दणदणीत विजय मिळवला असून बारामतीच्या राजकीय रंगभूमीवर वर्चस्व अधोरेखित केले आहे. एकूण 21 जागांपैकी तब्बल 20 जागांवर विजय मिळवत ‘निळकंठेश्वर पॅनल’ने विरोधकांना पराभूत केलं आहे.
या निवडणुकीत शरद पवारांच्या ‘बळीराजा सहकार पॅनल’ चा संपूर्ण पराभव झाला असून, भाजपचे चंद्रराव तावरे यांच्या ‘सहकार बचाव’ पॅनलला फक्त एकच जागा मिळवता आली आहे. स्वतः चंद्रराव तावरे हेच एकमेव विजयी उमेदवार ठरले.
अजित पवारांची ताकद अधोरेखित..
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘ब वर्ग’ गटातून 101 पैकी 91 मते मिळवत मोठा बहुमत सिद्ध केला. ही निवडणूक केवळ साखर कारखान्याची नसून, ती पवार कुटुंबातील अंतर्गत सत्तासंघर्षाचा केंद्रबिंदू ठरली.
निवडणुकीत चार पॅनल रिंगणात होते..
1. निळकंठेश्वर पॅनल (अजित पवार)
2. बळीराजा सहकार पॅनल (शरद पवार गट)
3. सहकार बचाव शेतकरी पॅनल (चंद्रराव तावरे)
4. कष्टकरी शेतकरी समिती (अपक्ष)
प्रारंभापासूनच ‘निळकंठेश्वर पॅनल’ आघाडीवर राहिला आणि बहुतेक गटांत विजय मिळवला. फक्त सांगवी गटातून चंद्रराव तावरे विजयी झाले.

राजकीय अर्थ आणि भविष्याचा वेध..
1. सहकारी साम्राज्यावरील पकड: या विजयामुळे अजित पवारांनी बारामतीत सहकारी क्षेत्रावर आपली पकड अधिक बळकट केली आहे.
2. विरोधकांची आव्हाने: शरद पवार गटाला नव्याने रणनीती आखण्याची गरज निर्माण झाली आहे.
3. राजकीय परिणाम: ही निवडणूक आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांवर प्रभाव टाकू शकते.






































