Homeताज्या बातम्याकल्याणमध्ये जुन्या इमारतीचा स्लॅब पडून 6 जणांचा मृत्यू, 5 जण जखमी; मुख्यमंत्र्यांची...

कल्याणमध्ये जुन्या इमारतीचा स्लॅब पडून 6 जणांचा मृत्यू, 5 जण जखमी; मुख्यमंत्र्यांची आर्थिक मदतीची घोषणा!

चार मजली जुन्या इमारतीचा वरचा स्लॅब कोसळून, सहा जण ढिगाऱ्याखाली अडकून मृत्युमुखी पडले, मृतांमध्ये एक चिमुरडी..

पोलीस वार्ता, ठाणे : राज्यात सर्वच ठिकाणी आज मंगळवारी पावसाच्या सरी पडल्या पुणे, मुंबई, नाशिकसह अन्य ठिकाणी दिवसभर पाऊस पाहायला मिळाला त्यातच ठाण्याच्या कल्याण पूर्व येथील चिकणीपाडा मंगलराघो नगर भागात एक इमारत दुर्घटना झाली आहे. आज 20 मे, मंगळवारी दुपारी 4 वाजेच्या दरम्यान चार मजली असलेल्या श्री सप्तशृंगी हौसिंग सोसायटीच्या वरच्या मजल्याचे छत कोसळून सहा जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. तर आणखीन पाच जण जखमी झाले आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार चालू आहेत.
दुर्घटनेचे माहिती मिळताच अग्निशनम दल, महापालिकेचे पथक घटनास्थळी दाखल झाले होते. बचाव कार्यात प्रथम आठ जणांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढले गेले. पण त्यातील सहा जण मृत्यू झाले होते. मृतांमध्ये दोन पुरुष, तीन महिला, आणि एक दीड वर्षाची मुलगी होती. इतर दोघांना जखमी असल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
श्री सप्तशृंगी हौसिंग सोसायटीच्या रहिवासी नागरिकांना मान्सून सुरू होण्यापूर्वीच इमारत खाली करण्यास सांगण्यात सांगितले होते, असे आता महापालिकेकडून स्पष्ट करण्यात आल्याचे समोर आले आहे. ही इमारत 40 वर्षे जुनी झाली असून धोकादायक स्थितीत नागरिक येथे राहत होते.
  • मृतांची नावे..
1)प्रमिला साहू (58)
2) नामस्वी शेलार (1.5)
3) सुनीता साहू (37)
4) सुजाता पाडी (32)
5) सुशीला गुजर (78)
6) व्यंकट चव्हाण (42)

  • जखमीची नावे..
1) अरुणा रोहिदास गिरणारायन (48)
2) शरवील श्रीकांत शेलार (04)
3) विनायक मनोज पाधी (4.5)
4) यश क्षीरसागर (13)
5) निखिल खरात (27)
6) श्रद्धा साहू (14)

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दुर्घटनेवर दुःख व्यक्त केले असून या संदर्भात त्यांनी अधिकृत एक्स हँडलवरून पोस्ट शेअर केली आहे. ज्यात त्यांनी मृतांच्या नातेवाईकांसाठी आर्थिक मदतीची घोषणा केली आहे. तसेच ते म्हणाले कल्याणमध्ये एका इमारतीचे छत कोसळून झालेल्या दुर्दैवी घटनेत सहा नागरिकांचा मृत्यू झाला. त्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. या ठिकाणी बचावकार्य आता पूर्ण झाले असून महापालिका आयुक्त स्वत: घटनास्थळी उपस्थित होते. या घटनेत पाच जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. जिल्हा प्रशासन त्यावर देखरेख ठेवून आहे. जखमींची प्रकृती सुखरुप आहे. त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी प्रार्थना मी ईश्वरचरणी करतो. मृतांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारच्या वतीने 5 लाख रुपये अर्थसहाय्य देण्यात येतील.

✍️पोलीस वार्ता प्रतिनिधी: दिनेश पाटील, ठाणे, संपर्क: 8097983334
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

ओव्हरलोड राख भरण्यावरून वाद ; धमकी व मारहाणीचा गुन्हा दाखल

0
भुसावळ - तालुक्यातील दिपनगर परिसरात ओव्हरलोड राख भरण्याच्या वादातून शिवीगाळ, धमकी व मारहाणीची घटना घडल्याची तक्रार भुसावळ तालुका पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे....

भुसावळात भट्टीजवळ उभी रिक्षा पेटली; मोठे नुकसान, सुदैवाने जीवितहानी टळली

0
भुसावळ - शहरातील जामनेर रोडवरील शेठ घासीलाल अँड सन्स या दुकानासमोर उभी असलेली रिक्षा अचानक पेट घेतल्याची घटना घडली. या आगीत रिक्षेचे मोठ्या प्रमाणात नुकसान...

भुसावळात ‘अमृत’ योजनेचा घोटाळा? नगराध्यक्षांचा संताप उसळला ; ठेकेदारांवर कारवाईची मागणी

0
८-१० वर्षे रखडलेली पाणी योजना , खर्च ९० कोटींवरून १३५ कोटींवर; नागरिकांना पाण्यासाठी हाल भुसावळ : शहरातील पाणीपुरवठा आणि विकासकामांच्या रखडलेल्या प्रश्नांवरून भुसावळच्या नगराध्यक्ष गायत्री...

मुहकीं देखभाल बच्चोंके संपूर्ण स्वास्थ्य के लिए बेहद जरूरी है।

0
इन्स्टिट्यूट ऑफ डेंटल सायन्सेस, बरेली के विशेषज्ञों का मानना है कि यदि शुरुआत से ही बच्चों के मुंह की सफाई पर ध्यान दिया जाए,...

बुरहानपूर: पशुओं के लिए पानी की हौज की व्यवस्था,सामाजिक पहल

0
बुरहानपुर में भीषण गर्मी को देखते हुए एक सराहनीय सामाजिक पहल की गई है। जायंट्स वेलफेयर फाउंडेशन अंतर्गत जायंट्स ग्रुप ऑफ बुरहानपुर ‘सहेली’ द्वारा...

ओव्हरलोड राख भरण्यावरून वाद ; धमकी व मारहाणीचा गुन्हा दाखल

0
भुसावळ - तालुक्यातील दिपनगर परिसरात ओव्हरलोड राख भरण्याच्या वादातून शिवीगाळ, धमकी व मारहाणीची घटना घडल्याची तक्रार भुसावळ तालुका पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे....

भुसावळात भट्टीजवळ उभी रिक्षा पेटली; मोठे नुकसान, सुदैवाने जीवितहानी टळली

0
भुसावळ - शहरातील जामनेर रोडवरील शेठ घासीलाल अँड सन्स या दुकानासमोर उभी असलेली रिक्षा अचानक पेट घेतल्याची घटना घडली. या आगीत रिक्षेचे मोठ्या प्रमाणात नुकसान...

भुसावळात ‘अमृत’ योजनेचा घोटाळा? नगराध्यक्षांचा संताप उसळला ; ठेकेदारांवर कारवाईची मागणी

0
८-१० वर्षे रखडलेली पाणी योजना , खर्च ९० कोटींवरून १३५ कोटींवर; नागरिकांना पाण्यासाठी हाल भुसावळ : शहरातील पाणीपुरवठा आणि विकासकामांच्या रखडलेल्या प्रश्नांवरून भुसावळच्या नगराध्यक्ष गायत्री...

मुहकीं देखभाल बच्चोंके संपूर्ण स्वास्थ्य के लिए बेहद जरूरी है।

0
इन्स्टिट्यूट ऑफ डेंटल सायन्सेस, बरेली के विशेषज्ञों का मानना है कि यदि शुरुआत से ही बच्चों के मुंह की सफाई पर ध्यान दिया जाए,...

बुरहानपूर: पशुओं के लिए पानी की हौज की व्यवस्था,सामाजिक पहल

0
बुरहानपुर में भीषण गर्मी को देखते हुए एक सराहनीय सामाजिक पहल की गई है। जायंट्स वेलफेयर फाउंडेशन अंतर्गत जायंट्स ग्रुप ऑफ बुरहानपुर ‘सहेली’ द्वारा...
error: Content is protected !!