1 एप्रिलपासून वीज स्वस्त होणार आहे. 2025-26 या वर्षासाठी वीज दरामध्ये सुमारे 10 टक्के कपात होणार आहे..

पोलीस वार्ता, मुंबई : महागाईमुळे त्रस्त महाराष्ट्रातील नागरिकांना एक दिलासा मिळाला आहे. महावितरण कंपनीने वीज दरात 10 टक्क्यांची कपात करण्याचा निर्णय घेतला आहे आणि याची अंमलबजावणी 1 एप्रिलपासून होणार असून नवे दर लागू होतील, महावितरण कंपनीने महाराष्ट्र राज्य वीज नियमक आयोगाकडे वीज दर कपातीचा प्रस्ताव पाठवला होता. या प्रस्तावावर सुनावण्या झाल्यानंतर आता महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाने वीज दर निश्चितीचे आदेश जारी केले. विशेष म्हणजे, पुढील 5 वर्षे वीज दर स्वस्त राहणार आहेत. विधानसभा निवडणुकीत दिलेल्या आश्वासनानुसार महायुती सरकारने हा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे नागरिकांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे.





































