यशोदा सीड्स कंपनीच्या चमको नामे कापूस बियाणे खरेदी केले होते. हे बियाणे पेरणीच्या 100 ते 150 दिवसांमध्ये पीक देणार होते..
पोलीस वार्ता, वणी : महाराष्ट्रात व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची लूट आणि बोगस खते व बियाणे हे आता रोजच्याच घटना झाल्या आहे. तरी देखील सरकारकडून अथवा कृषी मंत्र्यांकडून यावर कुठलीच कठोर कारवाई अथवा उपाययोजना नाही. शेतकऱ्याला नैसर्गिक संकटाबरोबरच या बोगस खते आणि बियाणे यांचा आर्थिक फटका बसत आहे.

नुकताच असा एक प्रकार यवतमाळ जिल्ह्यातील केळापूर तालुक्यात शेतकऱ्याबरोबर घडला आहे. येथील शेतकरी बोगस बियाणांमुळे मोठ्या अडचणीत सापडले आहे. तालुक्यातील सखी(वाढोना) येथील शेतकऱ्याची हिंगनघाट येथील यशोदा बियाणे कंपनीने फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. शेतकरी आकाश खोंडे यांनी खरीप हंगामाकरिता करंजी येथील जिजाऊ कृषी केंद्रातून यशोदा सीड्स कंपनीच्या चमको नामे कापूस बियाणे खरेदी केले होते. हे बियाणे पेरणीच्या 100 ते 150 दिवसांमध्ये पीक देणार होते. असे कृषी केंद्र चालकांनी सांगितले होते. मात्र प्रत्यक्षात तसे काही झाले नाही. पीक पेरणी करून आता 90 दिवस लोटूनही फक्त 4-5 फुलोरा/बोंड प्रत्येक झाडाला दिसत आहे. आजुन कापसाचे बोंडच आले नसल्याने शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. यासंदर्भात यशोदा सीड्स कंपनीला याची माहिती देऊन संबंधित कृषी केंद्र चालकाला विचारपूस केली असता त्यांने उडवाउडवीची उत्तर दिले आहे.
गेल्या काही वर्षांपासून राज्यात अश्या बोगस खते व बियाण्यांच्या कंपन्यांमार्फत शेतकऱ्यांची सर्हास लूट चालू आहे. शेतकऱ्यांच्या गळ्याला आर्थिक फास लावण्याच काम बोगस उत्पादकांबरोबर बोगस विक्रेत्ये देखील करत आहे. इतर कंपन्याप्रमाणेच यशोदा सीड्स कंपनीने देखील फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांला कुठलाही मोबदला देण्यास स्पष्ट नकार दिला आहे.






































