शहरातील एक हजार महिला लाभार्थ्यांना हा लाभ देण्यात येणार असून पात्र महिलांनी आपले अर्ज कागदपत्रांसह सादर करावे..
पोलीस वार्ता, नाशिक : महाराष्ट्र राज्य शासनाच्या महिला व बालविकास विभागाच्या वतीने 8 जुलै 2024 रोजीच्या शासन निर्णयान्वये राज्यातील महिला व मुलींना रोजगार निर्मितीस चालना देण्यासाठी व त्यांचे आर्थिक, सामाजिक पुनर्वसन करणे त्यांना स्वावलंबी व आत्मनिर्भर बनविणे यासाठी गरजू महिलांना पिंक (गुलाबी) ई-रिक्षा रोजगारासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
नाशिक शहरासाठी अशा 1 हजार महिला लाभार्थ्यांना हा लाभ देण्यात येणार असून पात्र महिलांनी आपले अर्ज आवश्यक कागदपत्रांसह जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय, नासर्डी पुलाजवळ, नाशिक–पुणे रोड, नाशिक येथे सादर करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी केले आहे. अशी माहिती जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सुनील दुसाने यांनी दि.12 सप्टेंबर, 2025 प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
शासन निर्णयानुसार ई-रिक्षा खरेदीसाठी, ई-रिक्षा किंमतीच्या 70 टक्के रक्कम बँक कर्ज व 20 टक्के रक्कम राज्य शासन हिस्सा याप्रमाणे असून 10 टक्के रक्कम पात्र लाभार्थीने स्वत: भरावयाची आहे. तसेच रिक्षा परवाना मिळविण्यासाठी शासनाकडून आवश्यक मदत लाभार्थ्यांना मिळणार आहे. योजनेचा लाभ 20 ते 50 वयोगटातील गरजू महिलांना मिळणार असून ज्यांचे वार्षिक उत्पन्न मर्यादा तीन लाखापेक्षा कमी आहेत. योजनेच्या इतर अटी व शर्ती कायम असल्याचे अधिकारी दुसाने यांनी सांगितले आहे.
भुसावळ - तालुक्यातील दिपनगर परिसरात ओव्हरलोड राख भरण्याच्या वादातून शिवीगाळ, धमकी व मारहाणीची घटना घडल्याची तक्रार भुसावळ तालुका पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे....
भुसावळ - शहरातील जामनेर रोडवरील शेठ घासीलाल अँड सन्स या दुकानासमोर उभी असलेली रिक्षा अचानक पेट घेतल्याची घटना घडली. या आगीत रिक्षेचे मोठ्या प्रमाणात नुकसान...
८-१० वर्षे रखडलेली पाणी योजना , खर्च ९० कोटींवरून १३५ कोटींवर; नागरिकांना पाण्यासाठी हाल
भुसावळ : शहरातील पाणीपुरवठा आणि विकासकामांच्या रखडलेल्या प्रश्नांवरून भुसावळच्या नगराध्यक्ष गायत्री...
भुसावळ - तालुक्यातील दिपनगर परिसरात ओव्हरलोड राख भरण्याच्या वादातून शिवीगाळ, धमकी व मारहाणीची घटना घडल्याची तक्रार भुसावळ तालुका पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे....
भुसावळ - शहरातील जामनेर रोडवरील शेठ घासीलाल अँड सन्स या दुकानासमोर उभी असलेली रिक्षा अचानक पेट घेतल्याची घटना घडली. या आगीत रिक्षेचे मोठ्या प्रमाणात नुकसान...
८-१० वर्षे रखडलेली पाणी योजना , खर्च ९० कोटींवरून १३५ कोटींवर; नागरिकांना पाण्यासाठी हाल
भुसावळ : शहरातील पाणीपुरवठा आणि विकासकामांच्या रखडलेल्या प्रश्नांवरून भुसावळच्या नगराध्यक्ष गायत्री...