राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यात येईल..
पोलीस वार्ता, नाशिक : अवकाळी पावसामुळे दिंडोरी तालुक्यात झालेल्या नुकसानीची पाहणी राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी आज दि.3 नोव्हेंबर रोजी सकाळी केली. जानोरी, कोरटे येथे पावसामुळे शेत पिकांच्या झालेल्या नुकसानाची पाहणी त्यांनी केली. यावेळी त्यांच्यासोबत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, उपविभागीय अधिकारी अप्पासाहेब शिंदे, तहसीलदार मुकेश कांबळे, तालुका कृषी अधिकारी नानाजी भोये, माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉ.भारती पवार आदी जण उपस्थित होते.
अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान होऊन शेतकरी संकटात सापडला आहे. त्यामुळे राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नुकसानीची माहिती देऊन शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल. केंद्र सरकारचे देखील पथक नुकसानीची पाहणी करणार आहे. गेल्या सप्टेंबर महिन्यातील नुकसान भरपाई मदत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आली आहे.
शेत पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे निर्देश यंत्रणेला दिले आहेत. लवकरच नुकसानीचा अहवाल प्राप्त होणार असून सदरचा अहवाल शासनास सादर करण्यात येईल. असे नाशिकचे नवीन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले आहे.
भुसावळ - शहरातील जामनेर रोडवरील शेठ घासीलाल अँड सन्स या दुकानासमोर उभी असलेली रिक्षा अचानक पेट घेतल्याची घटना घडली. या आगीत रिक्षेचे मोठ्या प्रमाणात नुकसान...
८-१० वर्षे रखडलेली पाणी योजना , खर्च ९० कोटींवरून १३५ कोटींवर; नागरिकांना पाण्यासाठी हाल
भुसावळ : शहरातील पाणीपुरवठा आणि विकासकामांच्या रखडलेल्या प्रश्नांवरून भुसावळच्या नगराध्यक्ष गायत्री...
भुसावळ - शहरातील जामनेर रोडवरील शेठ घासीलाल अँड सन्स या दुकानासमोर उभी असलेली रिक्षा अचानक पेट घेतल्याची घटना घडली. या आगीत रिक्षेचे मोठ्या प्रमाणात नुकसान...
८-१० वर्षे रखडलेली पाणी योजना , खर्च ९० कोटींवरून १३५ कोटींवर; नागरिकांना पाण्यासाठी हाल
भुसावळ : शहरातील पाणीपुरवठा आणि विकासकामांच्या रखडलेल्या प्रश्नांवरून भुसावळच्या नगराध्यक्ष गायत्री...