उमेदवारांनी 4 नाव्हेंबर 2025 रोजी सकाळी 11 ते दुपारी 2 यावेळेत आवश्यक कागदपत्रांसह उद्योजकता विकास केंद्र, उद्योग भवन, सातपूर नाशिक येथे उपस्थित रहावे..
पोलीस वार्ता, नाशिक : अनुसूचित जातीतील युवक- युवतींना नवउद्योजकांना उद्योजकता विकास संबंधी प्रशिक्षण देवून त्यांना स्वत:चा उद्योग, व्यवसाय स्वयंरोजगार निर्माण करण्यास संधी उपलब्ध करून देण्यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था(बार्टी) व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राद्वारे अनुसूचित जातीच्या युवक-युवतींना दि.7 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर 2025 पर्यंत एक महिना कालावधीचे उद्योजकता विकास प्रशिक्षणाचे आयेाजन केले आहे. यासाठी पात्र उमेदवारांनी 4 नाव्हेंबर 2025 रोजी सकाळी 11 ते दुपारी 2 यावेळेत आवश्यक कागदपत्रांसह उद्योजकता विकास केंद्र, उद्योग भवन, सातपूर आयटीआय जवळ, त्र्यंबक रोड, सातपूर नाशिक येथे उपस्थित रहावे, असे आवाहन महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे प्रकल्प अधिकारी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहीर केले आहे.
प्रशिक्षणासाठी उमेदवाराची शैक्षणिक पात्रता किमान 8 वी उत्तीर्ण अशी आहे. वयोमर्यादा 18 ते 45 वर्षे असावी. अनुसूचित जाती प्रवर्गातील जातीचे प्रमाणपत्र, आधार कार्ड, पॅन कार्ड, शाळा सोडल्याचा दाखला, गुणपत्रिका व छायाचित्र इत्यादी कागदपत्रे सोबत आणणे आवश्यक आहे.
या प्रशिक्षण कार्यक्रमातून सहभागी प्रशिक्षणार्थींना शासकीय कर्ज योजनांची माहिती, सिद्धी प्रेरणा प्रशिक्षण, उत्पादनाच्या किंमती, हिशेब पद्धती, उद्योग नोंदणी प्रमाणपत्र, उद्योजकीय व्यक्तिमत्व विकास, विविध क्षेत्रातील उद्योगसंधी, उद्योगाची निवड, प्रकल्प अहवाल, विपणन, ई-टेंडर, उद्योगांना प्रशिक्षण भेटी, उद्योगाचे वित्तीय व्यवस्थापन याविषयी तज्ज्ञांद्वारे मार्गदर्शन केले जाणार आहे.
भुसावळ - शहरातील जामनेर रोडवरील शेठ घासीलाल अँड सन्स या दुकानासमोर उभी असलेली रिक्षा अचानक पेट घेतल्याची घटना घडली. या आगीत रिक्षेचे मोठ्या प्रमाणात नुकसान...
८-१० वर्षे रखडलेली पाणी योजना , खर्च ९० कोटींवरून १३५ कोटींवर; नागरिकांना पाण्यासाठी हाल
भुसावळ : शहरातील पाणीपुरवठा आणि विकासकामांच्या रखडलेल्या प्रश्नांवरून भुसावळच्या नगराध्यक्ष गायत्री...
भुसावळ - शहरातील जामनेर रोडवरील शेठ घासीलाल अँड सन्स या दुकानासमोर उभी असलेली रिक्षा अचानक पेट घेतल्याची घटना घडली. या आगीत रिक्षेचे मोठ्या प्रमाणात नुकसान...
८-१० वर्षे रखडलेली पाणी योजना , खर्च ९० कोटींवरून १३५ कोटींवर; नागरिकांना पाण्यासाठी हाल
भुसावळ : शहरातील पाणीपुरवठा आणि विकासकामांच्या रखडलेल्या प्रश्नांवरून भुसावळच्या नगराध्यक्ष गायत्री...