Homeआरोग्यमहाराष्ट्रात ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग रेड अलर्ट; अतिवृष्टीचा इशारा; मुंबईकरांनी काळजी घेण्याचं...

महाराष्ट्रात ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग रेड अलर्ट; अतिवृष्टीचा इशारा; मुंबईकरांनी काळजी घेण्याचं आवाहन..

मुंबईत जोरदार पाऊस, अनेक भागात पाणी साचलं, पावसाचा रेल्वे, रस्ते आणि भुयारी मार्ग व मेट्रो वर परिणाम, हवामान विभागाने मुंबईसाठी रेड अलर्ट जारी केला..

पोलीस वार्ता, ठाणे : यंदा महाराष्ट्रात वेळेआधीच 2025 मध्ये मान्सूनचे जोरदार आगमन झाले आहे. कोकणासह आज पुणे, मुंबईत येऊन मान्सून चांगलाच बरसला आहे. या सुरुवातीच्या पावसातच मुंबई तुंबली आहे. अनेक भागात रस्त्यात पाणी साचलं असून वरळी मेट्रो भुयारी स्थानकात पाणी साचले आहे. मुंबईची जीवन वाहिनी असलेल्या लोकल सेवेवरही परिणाम झाला आहे. मध्य, पश्चिम आणि हार्बर या तीनही मार्गांवरील लोकल गाड्या उशिरा धावत आहे.

पुढील आजुन काही तास पावसाचा जोर चालू राहील असे हवामान खात्याने सांगितले आहे. सोमवारी सकाळी मुंबईसाठी ऑरेंज अलर्ट दिला होता पण मंगळवारी मुंबईसाठी रेड अलर्ट जारी केला असून ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांना देखील रेड अलर्ट दिला आहे. अतिवृष्टीचा इशारा देत हवामान खात्याकडून मुंबईकरांना काळजी घेण्याचं व आवश्यक असल्यासच घराबाहेर पडण्याचे आवाहन करण्यात आलं आहे.
  • मुंबई महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट..

राज्यात अनेक भागांत मुसळधार पाऊस सुरू असून विशेषतः मुंबई कोकण पश्चिम महाराष्ट्रात पुढील काही तास जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे प्रशासनाने सतर्कता ठेवून मदत कार्य करावे असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज प्रशासनाला दिले.
मुंबई महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाला भेट देऊन त्यांनी मुंबई शहर आणि उपनगरातील मुसळधार पावसामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा आढावा घेतला. मुंबईच्या मध्यवर्ती भागात गेल्या 12 तासात सुमारे 252mm पावसाची नोंद झाली असून कमी वेळात जास्त पाऊस पडल्याने मुंबईत जागोजागी पाणी साचले. घाटकोपर, सायन, मीलन सबवे, अंधेरी सबवे, किंगसर्कल, हिंदमाता अशा सखल भागातील परिसरातील पाण्याचा निचरा झाला असून सर्व परिस्थिती नियंत्रणात आहे. दरवर्षीच्या तुलनेत यंदा 15 दिवस आधीच मान्सूनचे आगमन होऊन जास्त पाऊस पडला, त्यामुळे नागरिकांची गैरसोय झाली आहे. असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

यावेळी राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन, मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी, अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर, अतिरिक्त आयुक्त बिपीन शर्मा, उपमुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव नवीन सोना तसेच मुंबई महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

✍️पोलीस वार्ता प्रतिनिधी: दिनेश पाटील, ठाणे, संपर्क: 8097983334
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दिपनगर रुग्णालयातील प्रकरणांची होणार चौकशी? मुख्य अभियंत्यांच्या भूमिकेकडे लागले लक्ष

0
भुसावळ : तालुक्यातील औष्णिक विद्युत केंद्र, दिपनगर येथील महाजनको रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी व रुग्णालय व्यवस्थापक गेल्या दहा वर्षांपासून कार्यरत असून त्यांच्या कार्यकाळात विविध वादग्रस्त...

बोरखेडा चौघा बालकांच्या हत्याकांडात आरोपी दोषी; शिक्षेकडे राज्याचे लक्ष

0
भुसावळ : रावेर तालुक्यातील बोरखेडा येथील चार निष्पाप बालकांच्या निर्घृण हत्याकांड प्रकरणात विशेष पोक्सो (फास्ट ट्रॅक) न्यायालयाने आरोपी महेंद्र सिताराम बारेला याला दोषी ठरविले...

स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीनिमित्त भगूरकरांसाठी आनंदाची बातमी, भगूरच्या दिशेने होणार रेल्वे ओव्हरब्रिज

रेल्वे प्रशासनाने हा ओव्हरब्रिज पुन्हा भगूरच्या दिशेने वळवण्यास मंजुरी दिली असून त्याचे नवीन डिझाईन स्वरूप भगूर नगरपरिषदेकडे प्राप्त झाले आहे.. पोलीस वार्ता, देवळाली : नाशिक...

बनावट कागदपत्रांवर नोकरी? पैसे उकळल्याचा आरोप; महाजनको रुग्णालयातील प्रकार चर्चेत

0
भुसावळ : तालुक्यातील दिपनगर येथील महाजनको औष्णिक विद्युत केंद्र रुग्णालयातील एका महिला कर्मचाऱ्याची नियुक्ती बनावट कागदपत्रांच्या आधारे झाल्याचा धक्कादायक दावा सूत्रांकडून करण्यात आला आहे....

केले के व्यापारी बनकर पहुंचे पुलिसकर्मी,खेत में उग रहा था गांजा

0
बुरहानपुर रमाकांत मोरे।  जिले की शाहपुर पुलिस ने एक अनोखी रणनीति अपनाकर अवैध गांजा खेती का भंडाफोड़ किया है। मुखबिर से सूचना मिलने के बाद...

दिपनगर रुग्णालयातील प्रकरणांची होणार चौकशी? मुख्य अभियंत्यांच्या भूमिकेकडे लागले लक्ष

0
भुसावळ : तालुक्यातील औष्णिक विद्युत केंद्र, दिपनगर येथील महाजनको रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी व रुग्णालय व्यवस्थापक गेल्या दहा वर्षांपासून कार्यरत असून त्यांच्या कार्यकाळात विविध वादग्रस्त...

बोरखेडा चौघा बालकांच्या हत्याकांडात आरोपी दोषी; शिक्षेकडे राज्याचे लक्ष

0
भुसावळ : रावेर तालुक्यातील बोरखेडा येथील चार निष्पाप बालकांच्या निर्घृण हत्याकांड प्रकरणात विशेष पोक्सो (फास्ट ट्रॅक) न्यायालयाने आरोपी महेंद्र सिताराम बारेला याला दोषी ठरविले...

स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीनिमित्त भगूरकरांसाठी आनंदाची बातमी, भगूरच्या दिशेने होणार रेल्वे ओव्हरब्रिज

रेल्वे प्रशासनाने हा ओव्हरब्रिज पुन्हा भगूरच्या दिशेने वळवण्यास मंजुरी दिली असून त्याचे नवीन डिझाईन स्वरूप भगूर नगरपरिषदेकडे प्राप्त झाले आहे.. पोलीस वार्ता, देवळाली : नाशिक...

बनावट कागदपत्रांवर नोकरी? पैसे उकळल्याचा आरोप; महाजनको रुग्णालयातील प्रकार चर्चेत

0
भुसावळ : तालुक्यातील दिपनगर येथील महाजनको औष्णिक विद्युत केंद्र रुग्णालयातील एका महिला कर्मचाऱ्याची नियुक्ती बनावट कागदपत्रांच्या आधारे झाल्याचा धक्कादायक दावा सूत्रांकडून करण्यात आला आहे....

केले के व्यापारी बनकर पहुंचे पुलिसकर्मी,खेत में उग रहा था गांजा

0
बुरहानपुर रमाकांत मोरे।  जिले की शाहपुर पुलिस ने एक अनोखी रणनीति अपनाकर अवैध गांजा खेती का भंडाफोड़ किया है। मुखबिर से सूचना मिलने के बाद...
error: Content is protected !!