दिना सिंचन प्रकल्पातील, 14 गावांसाठी या जलाशयातील पाण्याचा काहीच उपयोग होत नसल्याने शेतकऱ्यामध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

पोलीस वार्ता, चामोर्शी | तालुक्यातील गाव रेगडी, माडेआमगांव, चप्पलवाड़ा, कोडसेगाटा, पोतेपल्ली, मक्केपाल्ली, वरुर, गांधीनगर, माडेमधुली, कोटरी, पुजगुड़ा, गोलबंदी, सिमुलतला, पलाशपुर आदी गावाना सिंचनाची सोय नसल्याने अंतिम क्षणी पिकांना पाणी मिळत नाही. यामुळे पिके करपतात सिंचनाची समस्या लवकर मार्गी लावावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
चामोर्शी तालुक्यतील रेगडी गावातील शेतकऱ्यासाठी दिना नदीवरील, दिना सिंचन प्रकल्प शेतकऱ्यासाठी वरदान ठरले असले तरी त्या 14 गावांसाठी जलाशयातील पाण्याचा काहीच उपयोग होत नसल्याने शेतकऱ्यामध्ये नाराजी व्यक्त होत आहे. रेगडी येथील धरण निर्मितीला 50 वर्ष झाली असून धरणात मोठ्या प्रमाणात गाळ असल्याने सिंचन क्षमतेत घट झाली आहे. मुख्य कालवा व उपकाव्यांची देखभाल दुरुस्ती अभावी मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे.
अनेक वर्षापासून धरणाचे पाणी या गावांतील शेतकऱ्यांच्या शेतीला मिळावे यासाठी नागरिकांनी प्रयत्न केले आहे. मात्र प्रशासन व लोकप्रतिनिधीनी याकडे कानाडोळा केल्याने 14 गावांतील शेतकऱ्यांना सिंचनाचे पाणी उपलब्ध होऊ शकले नाही. या परिसरातील गावांना आजुन किती काळ प्रतीक्षा करावी लागेल? असा सवाल शेतकऱ्यांना पडला आहे? अनेक वर्षापासून शेतकारी दिना सिंचन प्रकल्पातील पाणी शेतीला मिळावे यासाठी लढा देत आहेत. त्यामुळे शासनाने लवकर याची दखल घ्यावी अशी मांगणी सर्वांकडून होत आहे.
✍️पोलीस वार्ता, प्रतिनिधी: नरेश ठाकरे (वणी) यवतमाळ, संपर्क: 9588664532


























