टपऱ्यांवर कारवाई झाली तर टपरी मालक, पालिका अधिकाऱ्यांना होणाऱ्या चौकशीला सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे टपऱ्यांवर पालिका कारवाई करत नसावी,

पोलीस वार्ता, ठाणे : शासनाची मान्यता असलेले फलक लावलेल्या बऱ्याच टपऱ्या काही वर्षांपासून कल्याण-डोंबिवली पालिका हद्दीतील मुख्य वर्दळींच्या रस्त्यावर पडक्या अवस्थेत आढळून येतात. या टपरी मालकांनी या टपऱ्यांमध्ये व्यवसाय करावा अशी अपेक्षा असते परंतु ते ह्या टपऱ्या परप्रांतीयांना भाड्याने देतात अशा तक्रारी आहेत. यात सिगारेट, गुटखा, पान मसाला अश्या विविध प्रकारच्या आरोग्य विघातक वस्तू पदार्थ यात विक्री केले जातात याकडे पालिकेचे दुर्लक्ष असते. या टपऱ्या मुख्य रस्त्यावर असल्यामुळे वाहतुकीस अडथळा ठरत आहे.
रस्त्यांवर, गटारांवर, फुटपाथवर या टपऱ्या ठेवल्या असल्याने या टपऱ्या आता पादचाऱ्यांना, रहदारीला त्रासदायक ठरत आहेत. टपऱ्यांवर कारवाई झाली तर टपरी मालक, पालिका अधिकाऱ्यांना होणाऱ्या चौकशीला सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे टपऱ्यांवर पालिका कारवाई करत नसावी. असा सूर येथील नागरिकांमध्ये दिसून येतो आहे.
एकीकडे कल्याण डोंबिवली पालिका शहराच्या विकासासाठी व सौंदर्य करण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना करताना दिसतात परंतु शहरातील हा टपऱ्यांचा विषय सौंदर्य बिघडवत असताना यावर मात्र पालिका प्रशासन पूर्णपणे दुर्लक्ष करत आहे.






































