घाटंजी या शहरात ‘ऑपरेशन सिंदुर’ च्या सन्मानार्थ सोमवारी ’19 मे’ ला भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली..
पोलीस वार्ता, वणी : यवतमाळ जिल्ह्यातील तालुका असलेल्या घाटंजी या शहरात ‘ऑपरेशन सिंदुर’ च्या सन्मानार्थ सोमवारी ’19 मे’ ला भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली. पहलगाममध्ये झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यात 27 निरपराध नागरिकांचा बळी गेला. अनेक लोक जखमी झाले. अनंतनाग जिल्ह्यातील बैसरन खोऱ्याजवळ टेकड्यांवर फिरणाऱ्या पर्यटकांवर दहशतवाद्यांनी हा क्रूर हल्ला केला होता. या हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तानाला जोरदार प्रत्युत्तर दिले. पाकमधील 9 दहशतवादी अड्ड्यांवर हवाई हल्ले करून अनेक दहशतवाद्यांना ठार केले.
या भारतीय सैन्याच्या पराक्रमी कारवाईचा गौरव करण्यासाठी आणि भारतीय जवानांच्या शौर्याला सलाम करण्यासाठी यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी शहरात भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन सोमवारी करण्यात आले होते. या रॅलीत आमदार राजू तोडसाम, स्थानिक नेते, माजी सैनिक आणि शहरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. रॅलीची सुरुवात स्टेट बँकेपासून झाली आणि जयस्तंभ चौकात पोहोचल्यावर आमदार तोडसाम यांच्या हस्ते उपस्थित माजी सैनिकांचा सन्मान करून रॅली थांबली, यावेळी सर्वांनी “भारत माता की जय आणि वंदे मातरम्” च्या घोषणांनी परिसर दणाणून टाकला होता.
सातारा (मीनाक्षी पोळ उंब्रज) : कराड तालुक्यातील तासवडे एमआयडीसीतील भीषण स्फोट प्रकरणाला आता नवे वळण मिळाले असून, अमोल सुभाष कांबळे यांच्या तक्रारीनंतर उच्चस्तरीय चौकशीचे...
सदरचे आदेश लग्नकार्य, मिरवणुका, तालुका आठवडे बाजार किंवा प्रेतयात्रेच्या जमावास लागू राहणार नाहीत..
पोलीस वार्ता, नाशिक : शहर परिसरात कायदा व सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी नाशिक...
सातारा (मीनाक्षी पोळ उंब्रज) : कराड तालुक्यातील तासवडे एमआयडीसीतील भीषण स्फोट प्रकरणाला आता नवे वळण मिळाले असून, अमोल सुभाष कांबळे यांच्या तक्रारीनंतर उच्चस्तरीय चौकशीचे...
सदरचे आदेश लग्नकार्य, मिरवणुका, तालुका आठवडे बाजार किंवा प्रेतयात्रेच्या जमावास लागू राहणार नाहीत..
पोलीस वार्ता, नाशिक : शहर परिसरात कायदा व सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी नाशिक...