हिंगोली (मीनाक्षी पोळ) येथे आज दिनांक12 मे 2026 रोजी शहरातील हिंगोली नगरपालिकेच्या कल्याण मंडपम् येथे संबोधी ॲकडमी महाराष्ट्र, सरस्वती महिला सेवाभावी संस्था व हिंगोली सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने चौथा सर्वधर्मिय विवाह सोहळा संपन्न झाला. या विवाह सोहळ्यात अकरा जोडपी सहभागी होऊन विवाहबद्ध झाली. हा मंगल परिणय विधी पु.भंते पय्याबोधी महाथेरो (नांदेड) यांच्या हस्ते संपन्न झाला.
या विवाह सोहळ्यास अध्यक्ष म्हणून समाजभुषण डॉक्टर भिमरावजी हत्तीअंबीरे हे होते, तर प्रमुख पाहुणे हिंगोली नगरपालिकेचे गटनेते श्रीराम बांगर, हिंगोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष सुरेशआप्पा सराफ, माजी नगरसेवक अनिल नेनवानी, हिंगोली शहर काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष मिलिंद उबाळे, नगरसेवक रविंद्र वाढे, वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष योगेश नरवाडे, भिमशक्तीचे जिल्हाध्यक्ष तथा हिंगोली जिल्हा काँग्रेस रोजगार व स्वयंरोजगार विभागाचे जिल्हाध्यक्ष विशाल इंगोले, ॲड.दिपक धांडे, भीमराव पतंगे, भगवान जगताप, शेषेराव जल्हारे, बाबुराव गवळी, एल.आर.कांबळे, रोहिदास साखरे, बाळासाहेब कीर्तने, शशिकांत हत्तीअंबिरे, बंडू नरवाडे, अक्षय इंगोले, आदी मान्यवर उपस्थित होते.
विवाह सोहळ्यास उपस्थित प्रमुख पाहुणे यांचा सत्कार सरस्वती महिला सेवाभावी संस्थेच्या अध्यक्षा, आयोजिका सौ.तारा खंदारे व आनंद खंदारे यांनी केला.
विवाह सोहळा यशस्वी होण्यासाठी सचिन कुरवाडे, यश इंगोले, कुलदिप इंगळे, प्रकाश पंडित,रोहन नेते,नामदेव कदम, गौतम श्रावणे, मुन्ना इंगोले, शंकर पोघे, सुनिताताई आवटे, यांनी परिश्रम घेतले


























