Homeताज्या बातम्याअवकाळी पावसात पिकांचे मोठे नुकसान ; सरसकट नुकसान भरपाई व कर्जमाफीची मागणी

अवकाळी पावसात पिकांचे मोठे नुकसान ; सरसकट नुकसान भरपाई व कर्जमाफीची मागणी

शिंदी परिसरातील शेतकऱ्यांची आर्त मागणी 

भुसावळ –  अवकाळी पावसाने शिंदी व परिसरातील कोरडवाहू भागातील शेतकऱ्यांची माती झालेली आहे. कापूस, मका आणि सोयाबीन या प्रमुख खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना सरसकट नुकसानभरपाई तसेच संपूर्ण कर्जमाफी जाहीर करावी,अशी मागणी येथील सामाजिक कार्यकर्त्या सौ.निलिमा गिरीश नेमाडे यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे केली आहे.

अवकाळी पावसाने उध्वस्त केली शेतकऱ्यांची मेहनत –
खरीप हंगामाच्या अखेरीस झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या मेहनतीवर अक्षरशः पाणी फिरले आहे.अनेक शेतकऱ्यांनी कर्ज काढून पिकांची लागवड केली होती,मात्र सततच्या पावसामुळे लावलेला खर्चही परत न मिळण्याची वेळ आली आहे.कापूस,मका आणि सोयाबीन पिकांचे मोठे नुकसान झाले असून,काही ठिकाणी कापसाच्या झाडांवर बोंड काळवंडले,तर काही ठिकाणी मक्याच्या कणसांना कोंब फुटले आहेत.

पंचनाम्यांतील त्रुटी आणि वंचित शेतकरी –

प्रशासनाने काही ठिकाणी सोयाबीन व मका पिकांचे पंचनामे करून नुकसानभरपाई जाहीर केली असली तरी अनेक शेतकरी पंचनाम्यांअभावी मदतीपासून वंचित राहिले आहेत.नुकसान सर्वत्र झाले असताना काही शेतकऱ्यांनाच मदत मिळणे हा अन्याय असल्याची भावना शेतकरीवर्गात आहे. त्यामुळे नुकसानभरपाई देताना कोणताही भेदभाव न करता सर्व शेतकऱ्यांना सरसकट मदत देण्यात यावी,अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

सततच्या पावसामुळे वाढलेले नुकसान –

गेल्या चार-पाच दिवसांपासून सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे परिस्थिती आणखी बिकट झाली आहे.कापसावर लाल्या रोगाचे आक्रमण सुरू झाले असून,फुलपाती व कैऱ्या गळून पडल्या आहेत.मका व सोयाबीन शेतातच कुजत आहे,तर मक्याचे ढीग भिजून जनावरांच्या चार्‍याचेही नुकसान झाले आहे. त्यामुळे खरीप हंगाम शेतकऱ्यांच्या हातचा गेल्याचे स्पष्ट झाले आहे.

शेतकऱ्यांची मागणी — “पंचनामे नाही, तर सरसकट मदत द्या !

शिंदी,मोंढाळ,विचवा,मानमोडी,विल्हाळा या कोरडवाहू भागांतील परिस्थिती पाहता,केवळ पंचनामे हा निकष न ठेवता हेक्‍टरी ५० हजार रुपये नुकसानभरपाई आणि संपूर्ण कर्जमाफी देण्यात यावी,अशी मागणी करण्यात आली आहे.या मागणीसाठी सौ.निलिमा गिरीश नेमाडे,माजी ग्रामपंचायत सदस्य दिलीप कोल्हे, अर्जुन धांडे,भूषण राजपूत,रवींद्र लोहार, अनिल कोल्हे,ऋषिकेश महाजन व माजी उपसरपंच भीमराव तायडे यांच्यासह परिसरातील मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते.

“पिकांचे झालेले नुकसान हे सर्वांचेच आहे. पंचनाम्यांच्या अडचणींमुळे कोणीही मदतीपासून वंचित राहू नये. शासनाने सर्व शेतकऱ्यांना सरसकट मदत करावी,
सौ.निलिमा नेमाडे

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

राज्यात ढगाळ हवामान, मेघगर्जनेसह वादळी पाऊस, कृषी विभागाचा शेतकऱ्यांना सतर्कता इशारा!

संभाव्य हवामान बदल लक्षात घेऊन योग्य ते प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना आवाहन.. पोलीस वार्ता, मुंबई : राज्यात पश्चिम भागात, घाट परिसर, खानदेश, मराठवाडा...

सोशल मीडियावर कोणतीही अफवा शेअर करताना खबरदारी बाळगावी -नाशिक पोलीस!

महिला छळ प्रकरणात पोलिसांनी तात्काळ व कठोर कारवाई केली असून नागरिक, माध्यमांकडून मिळालेल्या प्रतिसादाबद्दल पोलिसांनी आभार व्यक्त केले.. पोलीस वार्ता, नाशिक : शहरात घडलेल्या एका...

बैंक सुरक्षा को लेकर बुरहानपुर पुलिस अलर्ट

0
बुरहानपुर पुलिस द्वारा जिले में बैंकों की सुरक्षा व्यवस्था का निरीक्षण बैंक सुरक्षा चेकिंग को लेकर थाना प्रभारियों एवं स्टाफ ने किया व्यापक निरीक्षण दिनांक 18.04.2026...

“बुरहानपुर पुलिस का अनोखा अभियान

0
‘सृजन, सम्मान और अभिमन्यु’ से बालिकाओं को बनाया सशक्त” बुरहानपुर, 18 अप्रैल 2026 (प्रेस नोट): महिलाओं एवं बालिकाओं की सुरक्षा और सशक्तिकरण के उद्देश्य से बुरहानपुर...

जल गंगा संवर्धन अभियान

0
प्रभारी मंत्री श्री सिलावट ने किया हसनपुरा तालाब गहरीकरण कार्य का शुभारंभ प्रभारी मंत्री श्री तुलसीराम सिलावट ने ग्रामीणजनों के बीच बैठकर किया संवाद बुरहानपुर/18 अप्रैल,...

राज्यात ढगाळ हवामान, मेघगर्जनेसह वादळी पाऊस, कृषी विभागाचा शेतकऱ्यांना सतर्कता इशारा!

संभाव्य हवामान बदल लक्षात घेऊन योग्य ते प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना आवाहन.. पोलीस वार्ता, मुंबई : राज्यात पश्चिम भागात, घाट परिसर, खानदेश, मराठवाडा...

सोशल मीडियावर कोणतीही अफवा शेअर करताना खबरदारी बाळगावी -नाशिक पोलीस!

महिला छळ प्रकरणात पोलिसांनी तात्काळ व कठोर कारवाई केली असून नागरिक, माध्यमांकडून मिळालेल्या प्रतिसादाबद्दल पोलिसांनी आभार व्यक्त केले.. पोलीस वार्ता, नाशिक : शहरात घडलेल्या एका...

बैंक सुरक्षा को लेकर बुरहानपुर पुलिस अलर्ट

0
बुरहानपुर पुलिस द्वारा जिले में बैंकों की सुरक्षा व्यवस्था का निरीक्षण बैंक सुरक्षा चेकिंग को लेकर थाना प्रभारियों एवं स्टाफ ने किया व्यापक निरीक्षण दिनांक 18.04.2026...

“बुरहानपुर पुलिस का अनोखा अभियान

0
‘सृजन, सम्मान और अभिमन्यु’ से बालिकाओं को बनाया सशक्त” बुरहानपुर, 18 अप्रैल 2026 (प्रेस नोट): महिलाओं एवं बालिकाओं की सुरक्षा और सशक्तिकरण के उद्देश्य से बुरहानपुर...

जल गंगा संवर्धन अभियान

0
प्रभारी मंत्री श्री सिलावट ने किया हसनपुरा तालाब गहरीकरण कार्य का शुभारंभ प्रभारी मंत्री श्री तुलसीराम सिलावट ने ग्रामीणजनों के बीच बैठकर किया संवाद बुरहानपुर/18 अप्रैल,...
error: Content is protected !!