भुसावळ – शहरात भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या
जयंती निमित्त विविध ठिकाणी बॅनर लागलेले असून काही बॅनरवर कै.संतोष बारसे व कै.सुनील राखुंडे यांच्या दुहेरी हत्याकांडातील संशयित तडीपार आरोपी राजु भागवत

सुर्यवंशी याचे फोटो छापलेले असुन सदर व्यक्तीचे फोटो असलेले बॅनर हे ताबडतोब उतरविण्याकरीता मेहतर वाल्मिकी समाज अध्यक्ष मिथुन बारसे यांनी उपविभागीय अधिकारी जितेंद्र पाटील तसेच पोलिस अधिकारी कृष्णांत पिंगळे यांना निवेदन दिले आहे. भुसावळ शहरातील शांतता,कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि गुन्हेगारावर पोलिस प्रशासनाचा वचक निर्माण होणे आवश्यक आहे.त्यामुळे अशा खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीचे फोटो छापल्याने वाल्मिकी समाजबांधवांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत.भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर हे शांतीचे व अहिंसेचे पुरस्कर्ते होते, त्यांनी कधीही अशा हिंसक वृत्तीच्या व्यक्तींचे किंवा गुन्हेगारीचे समर्थन केलेले नाही.त्यामुळे अशा महामानवाच्या फोटो शेजारी अशा गुन्हेगारी स्वरूपाच्या व्यक्तीचे फोटो प्रदर्शित करणे चुकीचे आहे.त्यामुळे असे बॅनर हटविण्यात यावे,अशी विनंती मिथुन बारसे यांनी भुसावळचे उपविभागीय पोलिस अधिकारी व पोलिस प्रशासनाला केलेली असल्याची माहिती पत्रकार परिषदेत दिली.




































