यावल –आर.के.इंगळे। तालुक्यातील बामणोद गावातील महिला मुंबईला रविवार (ता.१०) रोजी भाजीपाला घेवून मुंबईला पोहचली असता त्यादरम्यान अचानक प्रकृतीत बिघाड झाल्याने खाजगी दवाखान्यात प्राथमिक उपचार घेवून दोन दिवसांनी बामणोदला परतली व पुढील उपचार सावदा व फैजपूर नंतर भुसावळला उपचार दरम्यान ता.१६ रोजी डेंगी सदृश आजाराची लागण झाल्याने मृत्यू झाला.मयत महिलेचे नाव कमल बाई गौतम केदारे (वय.६०) असे आहे.
महिला मुंबई येथून दोन दिवसांनी सावदयाला परतली व पुढील उपचार फैजपूर येथे करीत असतांना तपासणी दरम्यान डेंगी व मलेरिया झाल्याचे निष्पन्न झाले पुढील उपचारासाठी महिलेस भुसावळ येथिल खाजगी दरवाखान्यात उपचारासाठी दाखल केले प्रकृतीत सुधार न झाल्याने भुसावळ शहरातील गोल्डन अवर या दवाखान्यात उपचार दरम्यान रात्री मृत्यू झाला.रविवार सकाळी अकरा वाजेला त्यांचे बामणोद येथिल स्मशानभुमित अंत्यसंस्कार करण्यात आले.त्यांच्या पश्चात मुलगा व एक मूलगी सुना व नातवंडे असा परिवार आहे.


























