महात्मा फुले यांच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी तसेच शिक्षण व समाजसुधारणेच्या कार्यासाठी संजय खाडे फाउंडेशन सदैव तत्पर राहील, असे वचन खाडे यांनी दिले.

पोलीस वार्ता, वणी | शिक्षण ही मानवाची मुलभूत गरज आहे, शिक्षण घेतले तरच जीवन जगण्याला खरा अर्थ आहे; ही शिकवण महात्मा जोतीबा फुले यांनी समाजाला दिली. विद्येविना मती गेली, मती विना निती गेली, नीति विना गती गेली, गतिविना वित्त गेले, वित्त विना शूद्र खचले इतके अनर्थ एका अविद्वेने केले. असे महात्मा फुले सांगायचे. जो शिक्षणाचा प्रचार करतो, तोच समाजाचा उद्धार करतो. त्यामुळे शिक्षणाचा अधिकाधिक प्रचार व प्रसार झाला पाहिजे. असे मनोगत संजय खाडे यांनी व्यक्त केले. वणीतील जटाशंकर चौक येथील महात्मा फुले अभ्यासिका येथे आज 28 नोव्हेंबर महात्मा फुले पुण्यातिथी निमित्त अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना संजय खाडे बोलत होते. कार्यक्रमाला प्रशांत गोहोकर यांची प्रमुख उपस्थिती होती.



























