निंबा देवी धरण, वड्डी धरण, मोर धरण, आणि शेळगाव बॅरेज आणि वाझडिसरा तलाव, हरिपुरा धरण तसेच यावल येथील पाटचारी व तलाव परिसरात प्रवेश बंदी..

पोलीस वार्ता, भुसावळ | राज्यात सुरू असलेल्या पावसाच्या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी पूरस्थिती असताना जळगाव जिल्ह्यातील सतत सुरू असलेली अतिवृष्टी पाहता धरण, छोटे-मोठे तलाव, पाट यांच्यातून पाण्याचा विसर्ग करावा लागतो आहे. याच कारणाने यावल तालुक्याचे तहसीलदार मोहनमाला नाझीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार प्रशासनाने दिनांक 1 जून ते दिनांक 31 ऑक्टोंबर 2026 या कालावधीत मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या कारणास्तव सर्व नागरीकांना तालुक्यातील निंबा देवी धरण, वड्डी धरण, मोर धरण, आणि शेळगाव बॅरेज आणि वाझडिसरा तलाव, हरिपुरा धरण तसेच यावल येथील पाटचारी व तलाव परिसर यांसारख्या प्रमुख जलसाठा व पर्यटन क्षेत्रांच्या परिसरात प्रवेशावर कडक बंदी घातली आहे.

पावसामुळे पाण्याच्या पातळीत अचानक वाढ होऊ शकते. त्यामुळे नदी, नाले, धरण परिसर आणि धोकादायक भागांत नागरिकांनी जाणे टाळावे. पर्यटकांनी सातपुडा परिसरातील मनुदेवी धबधबा व मंदिर परिसरात विनाकारण गर्दी करू नये. नागरिकांनी पूर व आपत्कालीन स्थितीत टोल फ्री क्रमांक- 1077 आणि जिल्हा आपत्कालीन नियंत्रण कक्ष क्रमांक- 0257-2217193 / 0257-2223180 यावर संपर्क साधावा.




































