दि.16 मे ते 14 जून पर्यंत प्रगणक आपल्या दारी येऊन ही जनगणना करणार आहेत..

पोलीस वार्ता, येवला : तालुक्यातील जनगणना टप्पा एक स्वगणना कार्यक्रमाचा शुभारंभ राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते दि.2 मे रोजी येवला येथे करण्यात आला. याप्रसंगी मंत्री छगन भुजबळ यांनी आपली स्वगणना करून स्वतः ऑनलाईन फॉर्म भरत या प्रणालीचा शुभारंभ केला.

यावेळी बोलताना मंत्री भुजबळ म्हणाले, केंद्र सरकारने भारतीय जनगणनेला सुरुवात केली असून राज्यात 1 मे पासून जनगणना टप्पा क्रमांक-1 अर्थात 1 मे ते 15 मे पर्यंत स्वगणना कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे. तसेच दि.16 मे ते 14 जून पर्यंत प्रगणक आपल्या दारी येऊन ही जनगणना करणार आहेत. नागरिकांनी देखील शासनाच्या विविध योजनांचा लाभ सुरू ठेवण्यासाठी जनगणना करून घ्यावी, असे त्यांनी आवाहन केले.

































