भुसावळ – तालुक्यातील कंडारी गावातील संरक्षण भिंतीचे काम बांधकाम विभाग यांच्या अधिपत्याखाली सुरू असतांना इंजिनियर हमास खान यांनी सार्वजनिक महिलांचे शौचालय तोडले.ग्रामपंचायतीची कोणतीही परवानगी न घेता शासकीय मालमत्तेचे नुकसान केल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची तक्रार सरजू तायडे यांनी उपविभागीय अधिकारी सार्वजनिक बांधकाम उप विभाग भुसावळ यांना ता.२ रोजी दिली.
कंडारी येथे नदी पत्राला लागून संरक्षण भिंतीचे काम राज्य आपत्ती सौम्यीकरण निधी अंतर्गत मक्तेदार मे.स्पेक्ट्रम इन्फ्रास्ट्रक्चर नाशिक मार्फत बांधण्यात येत आहे.या सर्व कामांची देखरेख सार्वजनिक बांधकाम उप विभाग भुसावळ यांच्या अधिपत्याखाली होत आहे.उप अभियंता चंद्रशेखर तायडे व साईज इंजिनियर राजेश गुचरळ यांनी संरक्षण भिंतीसाठी ग्रामसभेच्या ठरावाची मागणी केली त्या मागणी नुसार दिलीप मोरे यांनी ४३ लोकांचा अर्ज दिला.ग्रामसभा ठराव क्रमांक ४ मध्ये ता.२७/६/२०२५ रोजी वार्ड क्रमांक २ मध्ये सामाजिक सभागृह,अंगणवाडी क्रमांक १०३, शिवगुफा यांना संरक्षण भिंतीचे काम करून मिळावी ही मागणी केली.
ठराव मंजूर करून उपविभाग कार्यालयात अर्ज देण्यात आला. त्या अनुषंगाने कामाची मागणी उप अभियंता चंद्रशेखर तायडे व साईज इंजिनियर राजेश गुरचळ यांनी ले- आऊट दिले.त्या माध्यमातून कामांची सुरुवात करण्यात आली.मक्तेदार यांचा साईड इंजिनियर हमास खान यांना काम करण्यासाठी व त्यांच्या सोयी नुसार काम करता यावे यासाठी तेथे १० ते १५ फुटावर सन २०१९ -२०२० रोजी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सार्वजनिक महिलांचे शौचालये बांधली होती.त्यांना अडथळा निर्माण होत असल्याने व त्यांच्या मिलरची येण्या जाण्याकरीता सार्वजनिक महिलांचे शौचालय जे.सी.बी. मशीनच्या साह्याने साईड इंजिनियर हमास खान यांनी ता.२३/१२/२०२५ रोजी तोडले. यामुळे महिलांची गैर सोय होत असून उघड्यावर बसावे लागत आहे.ही वेळ उपविभाग अभियंता साईड इंजिनियर राजेश गुरचळ तसेच साईड इंजिनियर हमास खान यांच्यामुळे आली आहे.























