जननायक ‘वीर बिरसा मुंडा’ यांचा जन्म 15 नोव्हेंबर 1875 रोजी उलिहाटू येथे झाला होता तर रांची तुरुंगात त्यांनी 9 जून 1900 रोजी अखेरचा श्वास घेतला.
वणी तालुक्यातील मुरधोनी गावात ‘वीर बिरसा मुंडा’ जयंतीनिमित्त कार्यक्रम..
पोलीस वार्ता, वणी | आदिवासी समाजक्रांतीचे जनक आणि स्वातंत्र्य युद्धात इंग्रजांविरुद्ध जनआंदोलन उभारणारे थोर क्रांतिकारक, जननायक ‘वीर बिरसा मुंडा’ यांची जयंती दि.15 नोव्हेंबर रोजी वणी तालुक्यातील मुरधोनी गावात आदिवासी बांधवांकडून मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
‘वीर बिरसा मुंडा’ जयंती दिवस हा ‘आदिवासी गौरव दिन’ म्हणून देखील साजरा केला जातो. बिरसा मुंडा यांना राष्ट्रीय नायक म्हणून मान्यता मिळण्यासाठी बराच काळ गेला. बिरसा मुंडा यांनी अगदी लहान वयातच इतिहास रचला. बिरसा मुंडा यांचा जन्म 15 नोव्हेंबर 1875 रोजी उलिहाटू येथे झाला आणि त्यांनी 1895 मध्ये उलगुलान सुरू केले. यानंतर ते फक्त पाच वर्षे जगले पण या पाच वर्षांत त्यांच्या बंडाने इंग्रज आणि जुलमी जमीनदार आणि अधिकारी नष्ट केले.
इंग्रज इतके घाबरले की त्यांनी बिरसा मुंडाच्या अटकेसाठी पाचशे रुपयांचे बक्षीस जाहीर केले. या लालसेपोटी देशद्रोह्यांनी बिरसा मुंडा यांचा ठावठिकाणा सरकारला कळवला आणि त्यांना अटक करण्यात आली. त्यांना रांची तुरुंगात ठेवण्यात आले होते, जिथे त्यांनी 9 जून 1900 रोजी अखेरचा श्वास घेतला आणि त्यांचे निधन झाले. रांची तुरुंगात बिरसा मुंडा यांचा मृत्यू कसा झाला हे अद्यापही रहस्य आहे. त्यांचा मृत्यू झाला तेव्हा ते फक्त 25 वर्षांचे होते. इतक्या लहान वयात एवढं मोठं काम त्यांनी केलं होतं.
यवतमाळ जिल्ह्यात, वणी तालुक्यात असलेल्या मुरधोनी गावातील आयोजित या जयंती उत्सव कार्यक्रमात प्रमुख्याने भिमजी नैताम, विलास मेश्राम, हनुमान मडावी, किशोर आडे रवी उईकें, सुरेभान नैताम, विवेक आऊ, कालिदास सिदाम महादेव मामा, तसेच उपसरपंच साईनाथ तोडसे, माजी सरपंच टिकाराम मडावी, बाल-गोपाल, वयोवृध्द नागरिक यांची मोठ्या प्रमाणात उपस्थित दिसली. कार्यक्रमाची सांगता अतिशय सुंदर व आनंद उत्सवाच्या वातावरणात झाली. या जयंती कार्यक्रमानिमित्त आदिवासी बांधवांनी महाप्रसादाचे आयोजन देखील केले होते.
कानूनी अधिकार, साइबर सुरक्षा व लैंगिक समानता पर जागरूकता
( गणेश सोलंकी ) छात्राओं को मिला मार्गदर्शन व आत्मविश्वास
खरगोन 16 अप्रैल 2026। “नारी शक्ति वंदन...
सातारा (मीनाक्षी पोळ उंब्रज) : कराड तालुक्यातील तासवडे एमआयडीसीतील भीषण स्फोट प्रकरणाला आता नवे वळण मिळाले असून, अमोल सुभाष कांबळे यांच्या तक्रारीनंतर उच्चस्तरीय चौकशीचे...
कानूनी अधिकार, साइबर सुरक्षा व लैंगिक समानता पर जागरूकता
( गणेश सोलंकी ) छात्राओं को मिला मार्गदर्शन व आत्मविश्वास
खरगोन 16 अप्रैल 2026। “नारी शक्ति वंदन...
सातारा (मीनाक्षी पोळ उंब्रज) : कराड तालुक्यातील तासवडे एमआयडीसीतील भीषण स्फोट प्रकरणाला आता नवे वळण मिळाले असून, अमोल सुभाष कांबळे यांच्या तक्रारीनंतर उच्चस्तरीय चौकशीचे...