अदखलपात्र गुन्ह्या ऎवजी सदर प्रकरणात FIR नोंद न केल्यास राम पाचकाळे जिल्हाधिकार्यालयावर करणार आंदोलन.
पत्रकारलाच न्याय नसेल मिळत तर सर्व सामान्यांचं काय ❓
कापूरहोळ (मीनाक्षी ताई पोळ ) येथील घडलेल्या गंभीर घटनेची योग्य दखल घेवून संबंधीत आरोपीविरूध्द FIR नोंद करण्यात यावी. दिनांक २८/४/२०२६ रोजी सायंकाळी ४.४५ वा. चे सुमारास कापूरव्होळ येथील हायवे रोडवरील सार्वजनिक ठिकाणी राम पाचकाळे पत्रकार म्हणुन हायवेवरील अतिक्रमण काढणेचे काम सुरू असल्याचे मोबाईलमध्ये चित्रीकरण / शुटिंग करत होते . त्यावेळी हॉटेल आनंद व आनंद वाईन्सचे मालक आनंद काशिनाथ दळवी त्यांचा मुलगा व इतर दोन अनोळखी इसम राहनार कापुरव्होळ यांनी मी चित्रिकरण करताना पत्रकार राम पाचकाळे यांना हॉटेल आनंद व आनंद वाईन्सचे मालक आनंद काशिनाथ दळवी त्यांचा मुलगा व इतर २ अनोळखी इसम यांनी येथे काय काम आहे, येथे येवू नकोस,असे म्हणत पाचकाळे यांना हाताने मारहाण केली, शिवीगाळ केली, दमदाटी केली व जिवे मारण्याची धमकी दिली असून सदर बाबत मी राजगड पोलीस स्टेशन कामथडी येथे तकार दिली असता, पोलीसांनी अदखलपात्र गुन्हा कं. ४१८/२०२६ असा नोंद करून घेतला असून, भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ११५ (२) ३५२, ३५१ (२) (३) ३ (५) अंतर्गत नोंद केली आहे. सदर घटना ही अत्यंत गंभीर स्वरूपाची असून, त्यामध्ये मारहान, धमकी, व पत्रकाराच्या कामात अडथळा निर्माण करण्यात आला आहे. त्यामुळे हा प्रकार केवळ दखलपात्र गुन्हा म्हणुन नोंदविणे योग्य नसून, संज्ञेय गुन्हा (Cognozan;e Offence) म्हणून FIR नोंद होणे आवश्यक आहे असे

निवेदनात म्हणण्यात आले आहे.
राष्ट्रीय स्वतंत्र संघ नई दिल्ली चे महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्य राम पाचकाळे यांनी न्याय मिळावा यासाठी पुढील मागण्यासाठी मागणी केली आहें.
१. सदर प्रकरणाची गंभीर दखल घेवून राजगड पोलीस स्टेशन कामथडीय यांना FIR नोंद करण्याचे आदेश द्यावेत.
२. संबंधीत आरोपीवर कडक कायदेशिर कारवाई करण्यात यावी.
३. मला व माझे कुटूंबास आवश्यक ती संरक्षणाची हमी देण्यात यावी.
तरी याबाबत नक्कीच न्याय मिळेल ही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहें . जर या प्रकणात तत्काळ न्याय न मिळाल्यास सोमवार दिनांक ११ मे २०२६ रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे येथे आंदोलन करण्यात येणार असल्याचे सोशल मीडियाशी बोलताना राम पाचकाळे यांनी म्हंटले आहें व त्याच्या होणाऱ्या सर्व परिणामास या प्रकरणातील शासकीय अधिकारी कार्यालय जबाबदार राहील असे निवेदनामध्ये म्हणण्यात आले आले.























