भुसावळ, (२५ नोव्हेंबर २०२५) शहरातील अनिल चौधरी यांनी आज (मंगळवारी) घेतलेल्या पत्रकार परिषदेत शहरातील प्रसिद्ध उद्योजक व राजकीय व्यक्ती मनोज बियाणी यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
चौधरी यांनी माध्यमांसमोर सादर केलेल्या पुराव्यांनुसार, मनोज बियाणी यांनी भुसावळमधील अकोला कोर्टाने त्यांचा वॉरंट काढला असल्याचा दावा केला. तसेच पोलिसांना न सापडणारा मनोज बियाणी मुख्यमंत्री यांच्या व्यासपीठावर मागे उपस्थित असतो. हे कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहे.
“ मी गेल्या अनेक महिन्यांपासून हे प्रकरण जवळून पाहत आहे. पुरावे गोळा केले आहेत.आता मी हे सर्व पुरावे लवकरच चार वकील लावून हायकोर्टात दाखल करणार आहे,” असे अनिल चौधरी यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. या प्रकरणामुळे भुसावळ शहरातील राजकीय वातावरण ढवळून निघाले असून पुढील काही दिवस हे प्रकरण चांगलेच चर्चेत राहणार आहे.




































