कोकणात तसेच अन्यत्र जाणाऱ्या गणेशभक्तांच्या सोयीसाठी दरवर्षी पेक्षा जादाच्या 367 फेऱ्यांचे नियोजन केले जाईल..

पोलीस वार्ता, मुंबई : महाराष्ट्रात गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो, या उत्सवासाठी गणेशभक्तांना आपल्याला गावी जाण्याची ओढ लागते, त्यामुळे कोकणात तसेच राज्यभरात इतरत्र जाण्यासाठी प्रवाशांची रेल्वे प्रवासात गर्दी निर्माण होते. यासाठी यंदा भारतीय रेल्वेने दरवर्षी पेक्षा यंदा 367 जादा फेऱ्यांसाठी रेल्वेगाड्या सोडण्याची नियोजन केल्याची माहिती केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती देतानाच, राज्यातील तमाम गणेशभक्तांच्यावतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचे आभार मानले आहे.






































