काही दिवसांपूर्वी झालेल्या खुनाच्या घटनेतून पुन्हा एकदा टोळी वर्चस्व वादात कामटवाडे येथे एकाचा दगडाने ठेचून खुन..

पोलीस वार्ता, नाशिक : शहरात दिवसाआड घडणाऱ्या खून्हाच्या घटना आणि इतर गुन्हे यामुळे वाढत्या गुन्हेगारीला आळा घालणे आणि गुन्हेगारांना पकडणे हे पोलीस यंत्रणेपुढे मोठे आव्हान बनले आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या खुनाच्या घटनेतून पुन्हा एकदा आज दि.29 एप्रिल रोजी टोळी वर्चस्व वादात कामटवाडे येथे एकाचा दगडाने ठेचून खुन करण्यात आला आहे. यासंबंधी गुन्हा दाखल होताच, आरोपींना पकडून कारवाई करण्याबाबत नाशिक शहर पोलीस आयुक्त मा.श्री.संदीप कर्णिक साहेब यांनी आदेश दिले होते.
त्याप्रमाणे नाशिक शहर गुन्हेशाखा युनिट-1 कडून आरोपींचा शोध घेत असतांना दि.28 एप्रिल 2025 रोजी पोह. विशाल काठे व प्रशांत मरकड यांना गुप्त माहिती मिळाली की, खुणाच्या गुन्ह्यातील आरोपी हे आसाराम बापु पुल, गंगापुर, या ठिकाणी थांबलेले आहेत. सदर माहिती मिळताच ती मा.वपोनि मधुकर कड यांना देवून त्यांच्या आदेशान्वये पोउनि. चेतन श्रीवंत, पोउनि. सुदाम सांगळे, पोह. प्रविण वाघमारे, प्रदिप म्हसदे, संदिप भांड, प्रशांत मरकड, विशाल काठे, नाझीमखान पठाण, योगीराज गायकवाड, पोना. विशाल देवरे, मिलींदसिंग परदेशी, पोअं. मुक्तार शेख, अमोल कोष्टी, पोह. सुकाम पवार यांचे पथक तयार करून मिळालेल्या माहितीनुसार आसाराम बापु पुल, गंगापुर, नाशिक येथे जाऊन परिसरात आरोपींचा शोध घेत असताना काही संशयित पोलीसांची गाडी पाहून पळतांना दिसुन आले.

त्यांना सव्वा सात वाजेच्या दरम्यान ताब्यात घेवुन त्यांचे नाव गाव यांची चौकशी केली असता नावे 1)मोहन ज्ञानेश्वर वायचळे (वय-18) रा. कामगार नगर, तिरंगा चौक, सातपुर 2)राहुल राजु गडदे (वय-20) रा. आनंदवल्ली, रिक्षा स्टेंड जवळ, मुळ गाव- नांदुर कोंडार, ता.नांदगाव जि.नाशिक 3)साहिल पिंटु जाधव (वय-21) रा. आनंदवली, माळी वाडा, गंगापुर रोड व इतर दोन विधीसंघर्षीत बालक असे एकूण पाच आरोपींना गुन्हेशाखेच्या पथकाने ताब्यात घेवून त्यांच्याकडे गुन्हाची विचारपुस केली असता त्यांनी सांगितले की, सराईत गुन्हेगार हर्षद पाटणकर याच्या सांगण्यावरून गुन्हा केला असल्याची कबुली दिली. आरोपींना पुढील कारवाईसाठी अंबड पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.





































