भुसावळ – (ऑल्विन स्वामी) विधानसभा निवडणुकीच्या पाश्वभूमीवर जागोजागी नाकाबंदी लावण्यात आल्याने अवैध धंदे वाल्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहे.रेल्वेने प्रवास केल्यास योग्य ठिकाणी सुरक्षित माल पोहचवण्याची अवैध धंदे करणाऱ्यांनी शक्कल लढविली मात्र रेल्वे सुरक्षा बल विभागाच्या सतर्कतेने डाव फसला असून पुरी – अहमदाबाद एक्सप्रेस मध्ये बारा किलो गांजा १५ रोजी रात्री बारा वाजेच्या सुमारास जप्त करण्यात आला आहे.
दरम्यान पुरी – अहमदाबाद एक्सप्रेस ट्रेन क्रमांक (१२८४३) नागपूर ते भुसावळ विभागामध्ये रेल्वे सुरक्षा बल विभागाचे कर्मचारी कोच क्रमांक ए -१,ए -२,बी-१, बी-२, बी-३ मध्ये पेट्रोलिंग करीत असतांना ट्रेन मलकापूर स्टेशन जवळ पोहचली असता कोच क्रमांक बी -३ सीट नंबर सात वर एक संशयित बँग मिळाली याबाबत कोच मधील प्रवाशांना विचारपूस केली असता ती बँग आमची नसल्याची सांगितले. रेल्वे सुरक्षा बल विभागाचे कर्मचाऱ्यांनी तात्काळ नियंत्रण कक्षाला सदरील माहिती कळविले असता सदरील कारवाई रेल्वे सुरक्षा बल भुसावळ विभागाचे स्टेशन निरीक्षक पी.आर.मीना यांच्या पथकाने करून बारा किलो गांजा जप्त केला आहे.


























