बदलापूरजवळील चामटोली तेथील उल्हास नदीत पत्रात धुलीवंदन खेळून दुपारी 3 वाजेच्या सुमारास 8 विद्यार्थी मित्र उल्हास नदी पात्रात गेले होते..
पोलीस वार्ता, बदलापूर : ठाणे जिल्ह्यातील बदलापूरच्या उल्हास नदी पात्रात पोहण्यासाठी उतरलेल्या चौघांचा बुडून मृत्यू झाला आहे. चारही विद्यार्थी पंधरा-सोळा वर्षाचे होते, सर्व 10 चे विद्यार्थी असून त्यांची परीक्षा चालू होती व 17 मार्चला शेवटचा पेपर होता अशी माहिती मिळाली आहे.
सविस्तर वृत्त असे की, परीक्षा आणि सण यामध्ये मिळालेल्या सुट्टीमुळे बदलापूरजवळील चामटोली तेथील उल्हास नदीत पत्रात धुलीवंदन खेळून दुपारी 3 वाजेच्या सुमारास 8 विद्यार्थी मित्र उल्हास नदी पात्रात गेले होते. नदीत ज्या ठिकाणी कोणीही पोहण्यासाठी जात नाही, त्याच ठिकाणी हे पोहण्यासाठी गेले, त्यानंतर पाण्याचा अंदाज न आल्याने पहिले एकजण बुडू लागला. हे पाहून त्याला वाचवण्यासाठी गेलेल्या एकामागे एक असे चारजण उल्हास नदीत पात्रात बुडाले. आणि त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
चारही विद्यार्थी चामटोली जवळील पोद्दार गृह संकुलात राहणारे होते. हा परिसर कुळगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत येतो, बुडून मृत्यू झालेल्या चारही विद्यार्थ्यांची नावे; आर्यन मेदर (वय 15), आर्यन सिंग (16), सिद्धार्थ सिंग (16), ओम तोमर (15) अशी आहेत. गावकरी, अग्निशमन आणि स्थानिक पोलीस यानी घटनास्थळी धाव घेऊन बुडालेल्या चारही विद्यार्थ्यांचे मृतदेह नदीपात्रात शोध घेऊन बाहेर कडले असून मृतदेह शाहू विच्छेदनासाठी बदलापूर ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.
बुरहानपुर, (डॉक्टर प्रवीण पाटिल) 26 जुलाई। कारगिल विजय दिवस के अवसर पर ताप्ती सेवा समिति, बुरहानपुर द्वारा वीर जवानों के स्मारक पर पहुँचकर कारगिल युद्ध...
पदाधिकारियों को प्रमाणपत्र व आई-कार्ड प्रदान
बुरहानपुर। इंडियन जर्नलिस्ट एसोसिएशन की जिला इकाई का गठन एवं पदाधिकारी नियुक्ति समारोह जय स्तंभ के समीप स्थित एक...
बुरहानपुर, (डॉक्टर प्रवीण पाटिल) 26 जुलाई। कारगिल विजय दिवस के अवसर पर ताप्ती सेवा समिति, बुरहानपुर द्वारा वीर जवानों के स्मारक पर पहुँचकर कारगिल युद्ध...
पदाधिकारियों को प्रमाणपत्र व आई-कार्ड प्रदान
बुरहानपुर। इंडियन जर्नलिस्ट एसोसिएशन की जिला इकाई का गठन एवं पदाधिकारी नियुक्ति समारोह जय स्तंभ के समीप स्थित एक...