चोपडा प्रतिनिधी.. ग्रामीण पोलीस स्टेशन येथे गेल्या २२ तारखेला चोपडा तालुक्यातील वराड गावातील एका आदिवासी समाजातील मुलगा -मुलगी हे प्रेम विवाह करण्यासाठी पळून गेले. म्हणून मुलीचे आई-वडीलांनी आपल्या मुलीला पळवण्यामागे गावातील सुषमा दिलीप भिल्ल, विलास सुकलाल भिल्ल, इंदर मुन्ना भिल्ल, गोविंदा उखा भिल्ल यांना दुपारी एक वाजेच्या सुमारास चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात बोलवण्यात आले. व त्यांना पोलीस उपनिरीक्षक साजन नार्हेडा यांनी तुमच्या गावातील तुमच्या समाजातील जो मुलगा मुलीला घेऊन पळाला आहे. त्याच्यात तुमचा हात असल्याचे सांगितले परंतु या घटनेशी आमचा तिळमात्र सबंध नाही असे सुषमाताई बिल यांनी सांगितले. म्हणून साजन नार्हेडा त्याचा राग आला नार्हेडा या पोलीस उपनिरीक्षक यांनी चारही लोकांना पट्ट्याने बेदम मारहाण केली त्या नंतर त्यातील तीनघं तरूणांना अंगावरील कपडे काढण्यास प्ररावृत केले. हे पोलीस उपनिरीक्षक महाशय एवढ्यावर न थांबता त्यांनी चक्क त्यांना नागडे करून एकमेकांच्या हातात लिंग धरायला भाग पाडले. तरी त्यांचे समाधान झाले नाही म्हणून त्या तिघांना एकमेकांचे लिंग तोंडात घ्यायला सांगितले हा एवढा घाणेरडा प्रकार चोपडा ग्रामीण पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांच्या लक्षात आला असता त्यांनी कुठल्याही प्रकारचा विलंब न करता पोलीस उपनिरीक्षक नार्हेडा यांना तडकाफडकी निलंबित करण्याची शिफारस जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ महेश्वर रेड्डी यांच्या कडे पाठवली. परंतु हे प्रकरण एवढ्यावरच थांबले नाही तर आदिवासी समाजातील पुढार्यांनी या प्रकराणाला जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ महेश्वर रेड्डी यांच्या कडे निवेदन स्वरूपात देण्यात आले पोलीस उपनिरीक्षक साजन नार्हेडा यांच्या वर रितसर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी अशी मागणी केली आहे.
यासंदर्भात चोपड्याचे डीवायएसपी आण्णासाहेब घोलप यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, संबंधित निलंबित पोलीस उपनिरीक्षक साजन नार्हेडा यांची विभागीय चौकशी सुरू असून चौकशी दरम्यान जे काही निष्पन्न निघेल त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात येईल असे सांगितले…
पोलीस वार्ता न्यूज साठी प्रतिनिधी विनायक पाटील चोपडा जिल्हा जळगाव




































