भुसावळ – आषाढी एकादशीच्या दिवसाला पंढरपूर मध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी असल्याने ज्या वारकऱ्यांना विठ्ठलांचे दर्शन घेता आले नाही असे वारकऱ्यांसाठी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या संकल्पनेतून २४ डब्यांची यात्रा विशेष रेल्वेगाडी ( भुसावळ ते पंढरपूर) ता.१९ रोजी रात्री पावणे दहा वाजेला भुसावळ रेल्वे फलक क्रमांक आठ वरून रवाना झाली.या ट्रेन मध्ये तीन हजार वारकरी प्रवास करीत आहे.तर विशेष रेल्वेगाडी २५ रोजी भुसावळ – पंढरपूर रवाना होणार आहे.
यादरम्यान विट्ठलांच्या दर्शनासाठी खास करून जेष्ठ नागरिकांना प्राधान्य देण्यात आले.यावेळी स्वतः मा.ना.गिरीश महाजन सह पत्नी सौ. साधना महाजन तसेच भाजपाचे महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष केतकी पाटील तसेच उद्योगपती मजोज बियाणी यांनी वारकऱ्यांना सुखाचा प्रवास होण्यासाठी भेट घेवून शुभेच्छा दिल्या. यावेळी मा.ना.गिरीश महाजन यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला असता यावेळी शेतकऱ्यांची पेरणी झालेली आले पीक ही उत्तम आलेली आहे.मध्येच पावसाने दांडी मारलेली आहे.” मी विठुरायाच्या चरणी साकळे घालतो चांगला पाऊस पडू दे,शेतकऱ्यांना चांगले दिवस येऊ ये” असे प्रार्थना केली.यावेळी मा.ना.गिरीश महाजन यांचे मतदार संघातील भाजपचे पदाधिकारी व हजारो कार्यकर्ते उपस्थित होते.
जामनेर वरून बस ने दोन हजार वारकरी विट्ठलांच्या दर्शनासाठी ता.१९ रोजी रवाना झाले.


























