शासनमान्य हमी भाव खरेदी केंद्रावर सोयाबीन विक्रीसाठी आणण्यापूर्वी शेतकऱ्यांनी ते व्यवस्थित वाळवावे.

पोलीस वार्ता, नाशिक: जिल्ह्यातील वेगवेगळ्या तालुक्यात सोयाबीन खरेदी करण्यात येते. शासनमान्य हमी भाव खरेदी केंद्रावर सोयाबीन विक्रीसाठी आणण्यापूर्वी शेतकऱ्यांनी ते व्यवस्थित वाळवावे. सोयाबीनमधील आर्द्रतेचे प्रमाण 12 टक्क्यांपेक्षा कमी असल्याची व ते एफएक्यू दर्जाचे असल्याची खात्री करावी, असे आवाहन जिल्हा मार्केटिंग फेडरेशन मार्फत जिल्हा पणन अधिकारी बी.आर.पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
शेतकऱ्यांनी त्यांच्याकडील सोयाबीनचे नमुने खरेदी केंद्रावर आणून त्यातील आर्द्रता तपासावी व आर्द्रता 12 टक्क्यांपेक्षा कमी असेल, तरच सोयाबीन विक्रीसाठी केंद्रावर आणावे. जेणेकरून जास्त आर्द्रतेमुळे सोयाबीन परत नेण्याची वेळ येणार नाही, असेही प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.






































