राज्यात आज 20 ऑक्टोबर रोजी पश्चिम महाराष्ट्र, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड, लातूर, परभणी, धाराशिव, बीड, अहिल्यानगर, सातारा, सांगली, कोल्हापूर, कोकण या भागात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस..

पोलीस वार्ता, ठाणे | भारतातून मान्सून माघारी फिरल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे. असे असताना महाराष्ट्रात आज 20 ऑक्टोबर पासून पुढील दोन दिवस जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.
बंगालच्या उपसागरात पुन्हा एकदा कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने हवामानात बदल झाला असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे. त्यामुळे कोकणसह मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढताना दिसत आहे. राज्यात आज 20 ऑक्टोबर रोजी पश्चिम महाराष्ट्र, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड, लातूर, परभणी, धाराशिव, बीड, अहिल्यानगर, सातारा, सांगली, कोल्हापूर, कोकण या भागात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता सांगण्यात आली आहे.



























