गरताळा-अखौरा एकात्मिक चेक पोस्टपासून 31 किमी अंतरावर असलेल्या ब्राह्मणबारियाजवळ बस अपघातातून थोडक्यात बचावली. (सूचक छायाचित्र)
भारत आणि बांगलादेशातून 28 प्रवाशांना घेऊन आगरतळाहून ढाक्याला जाणाऱ्या बसला शनिवारी ब्राह्मणबारिया येथे किरकोळ अपघात झाला. बांगलादेशच्या श्यामोली परिवहनची ढाकाकडे जाणारी बस शनिवारी सकाळी 28 प्रवाशांसह आगरतळा येथून निघाली होती.
अधिकृत सूत्रांनी सांगितले की, आगरतळा-अखौरा एकात्मिक चेक पोस्टपासून 31 किमी अंतरावर असलेल्या ब्राह्मणबारियातील आशुगंज येथे पोहोचल्यावर मालाने भरलेल्या ट्रकने ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला आणि बस एका ऑटो-रिक्षाला धडकली, ज्यामुळे स्थानिक लोकांमध्ये घबराट पसरली.
या घटनेत बस किंवा रिक्षातील कोणताही प्रवासी जखमी झाला नाही. बांगलादेशात नुकत्याच झालेल्या अशांततेनंतर बससेवा सध्या अनियमित आहे. बसमध्ये 7 भारतीय प्रवासी असल्याची माहिती आहे.
त्रिपुराचे परिवहन मंत्री सुशांत चौधरी यांनी त्यांच्या अधिकृत हँडलवरून पोस्ट केले की अपघाताची परिस्थिती निर्माण करण्याचा ट्रकने प्रयत्न केला होता, जो पूर्वनियोजित असावा. अपघातानंतर बसमध्ये प्रवास करणाऱ्या भारतीय प्रवाशांना स्थानिक बांगलादेशी आणि भारतविरोधी घोषणा देऊन धमकावण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे.




































