थंडीची तीव्रता अधिक जाणवत आहे; उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांमध्ये पारा घसरल्याने थंडी अधिक, शुक्रवार 29 नोव्हेंबर आणि शनिवार, 30 नोव्हेंबर दरम्यान तीव्रता कायम राहणार..

पोलीस वार्ता, पुणे | हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, उत्तर भारतातून थंड वारे वाहत असल्यामुळे उत्तर-मध्य महाराष्ट्रात विशेषतः नाशिक, पुणे आणि अहिल्यानगर जिल्ह्यांमध्ये थंडीची लाट पसरली आहे. या लाटेचा परिणाम शुक्रवार, 29 नोव्हेंबर आणि शनिवार, 30 नोव्हेंबर दरम्यान कायम राहणार असल्याचा अंदाज आहे. त्यामुळे या काळात या भागात तापमान कमी होण्याची शक्यता आहे आणि थंड वारे सतत वाहत राहतील. यामुळे लोकांना अधिक गरम कपड्यांचा वापर करावा लागेल.

दि.28 नोव्हेंबर रोजी नाशिक जिल्ह्यात ओझर येथील तापमान 6.6°C पर्यंत घसरले, जे राज्यातील या हंगामातील नीचांकी तापमान आहे. निफाडमध्ये तापमान 8.8°C, तर नाशिकमध्ये सरासरीपेक्षा 4.2°C कमी होऊन ते 10.5°C वर पोहोचले. हे तापमान कमी होण्याचे कारण उत्तर भारतातून येणाऱ्या थंड वाऱ्यांचा परिणाम आहे, ज्यामुळे या भागातील थंडी अधिक तीव्र झाली आहे.

माहितीनुसार, गेल्या तीन दिवसांपासून राज्यात विशेषतः सायंकाळपासून ते पहाटेपर्यंत थंडीची तीव्रता अधिक जाणवत आहे. उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांमध्ये पारा घसरल्याने थंडी अधिक तीव्र झाली आहे. कोकण आणि मुंबईमध्येही किमान तापमान सरासरीपेक्षा 2 ते 3 अंशांनी कमी झालं आहे.
नाशिक जिल्ह्यातील ओझर, निफाड, कुंदेवाडी, रुई, रानवड, नांदुर्डी आणि सुकेणे या परिसरात किमान तापमान 8°C पर्यंत घसरले आहे. या परिस्थितीमुळे राज्यात थंडीचा प्रभाव अधिक जाणवत असून, लोकांना गरम कपड्यांचा वापर करण्याची आवश्यकता भासत आहे.
- अधिक माहिती साठी पुढील संकेत स्तळावर भेट द्या: https://mausam.imd.gov.in/responsive/districtWiseWarningGIS





































