भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माला सिडनी येथे गुरुवारपासून सुरू होणाऱ्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यासाठी ‘विश्रांती’ दिली जाण्याची शक्यता आहे. त्याच्या अनुपस्थितीत वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह संघाचे नेतृत्व करेल. सध्या सुरू असलेल्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत रोहितला खूप संघर्ष करावा लागला आहे कारण त्याने तीन सामन्यांमध्ये फक्त 31 धावा केल्या आहेत. दुसऱ्या मुलाच्या जन्मानंतर त्याने कुटुंबासोबत राहण्याचा निर्णय घेतल्याने तो पहिला कसोटी सामना खेळू शकला नाही. मात्र, ॲडलेडमध्ये संघात आल्यापासून तो मोठी धावसंख्या करण्यात अपयशी ठरला आहे.
या लेखात नमूद केलेले विषय




































