नवी दिल्ली:
केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक मोठे निर्णय घेतले आहेत. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, सरकारने पीक विमा योजनेचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला असून, त्याचा फायदा ४ कोटी शेतकऱ्यांना होणार आहे. यासोबतच सरकारने डीएपी खताच्या किमतीही कमी केल्या आहेत.
पीक विमा योजनेची मुदतवाढ
सरकारने पीक विमा योजनेची व्याप्ती वाढवण्याचा निर्णय घेतला असून त्यात आणखी 4 कोटी शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे अधिकाधिक शेतकऱ्यांना पिकांच्या नुकसानीच्या वेळी आर्थिक मदत मिळू शकेल. सरकारने डीएपी खतावर 3,850 कोटी रुपयांचे अतिरिक्त अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे शेतकऱ्यांना 50 किलोची डीएपी बॅग 1,350 रुपयांना मिळत राहील. आंतरराष्ट्रीय बाजारात डीएपीचे भाव वाढले असतानाही शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे.
सरकारने शेतकऱ्यांसाठी एकूण 69,515 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, आंतरराष्ट्रीय बाजारात डीएपीच्या किमती सातत्याने वाढत आहेत. या वाढीचा बोजा शेतकऱ्यांवर पडू नये, यासाठी सरकारने वाढीव अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे.




































