शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत मिळावी यासाठी शासन स्तरावर आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल..
पोलीस वार्ता, सिन्नर : जिल्ह्यात ऐन उन्हाळ्यात दोन दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे जिह्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, या नुकसानीचे राज्याचे आपत्ती व्यवस्थापन व जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांनी दि.4 एप्रिल रोजी सिन्नर तालुका दौरा करून नुकसान ग्रस्त परिसराची पाहणी केली.
यावेळी चिंचोली, वडगाव, पिंगळा या गावांमध्ये शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी करून माहिती घेतली तसेच चिंचोली येथे शेतकरी रमेश नागरे यांच्या कांदा पिकाची तसेच आनंदीबाई काशिनाथ कांगणे यांच्या बीट व कांदा पिकाची पाहणी केली. तर वडगाव पिंगळा येथे विठ्ठल सांगळे आणि कचरू गंधास यांच्या नुकसानग्रस्त शेती पीकांची मंत्री महाजन यांनी पाहणी केली.
प्रशासनाला तात्काळ पंचनामे करून नुकसानीचा सविस्तर अहवाल शासनाकडे सादर करण्याचे मंत्री महाजन यांनी निर्देश दिले. शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत मिळावी यासाठी शासन स्तरावर आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल, शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये. त्यांना तातडीने नुकसान भरपाई मिळावी यासाठी प्रयत्नशील आहे,” असे आश्वासनही महाजन यांनी यावेळी दिले. पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, सरसकट नुकसान भरपाई देण्याची मागणी उपस्थित शेतकऱ्यांनी मंत्री महाजन यांच्याकडे केली.
भुसावळ - शहरातील जामनेर रोडवरील शेठ घासीलाल अँड सन्स या दुकानासमोर उभी असलेली रिक्षा अचानक पेट घेतल्याची घटना घडली. या आगीत रिक्षेचे मोठ्या प्रमाणात नुकसान...
८-१० वर्षे रखडलेली पाणी योजना , खर्च ९० कोटींवरून १३५ कोटींवर; नागरिकांना पाण्यासाठी हाल
भुसावळ : शहरातील पाणीपुरवठा आणि विकासकामांच्या रखडलेल्या प्रश्नांवरून भुसावळच्या नगराध्यक्ष गायत्री...
भुसावळ - शहरातील जामनेर रोडवरील शेठ घासीलाल अँड सन्स या दुकानासमोर उभी असलेली रिक्षा अचानक पेट घेतल्याची घटना घडली. या आगीत रिक्षेचे मोठ्या प्रमाणात नुकसान...
८-१० वर्षे रखडलेली पाणी योजना , खर्च ९० कोटींवरून १३५ कोटींवर; नागरिकांना पाण्यासाठी हाल
भुसावळ : शहरातील पाणीपुरवठा आणि विकासकामांच्या रखडलेल्या प्रश्नांवरून भुसावळच्या नगराध्यक्ष गायत्री...