तब्बल अडीच तास गर्भवती बाई व बाळ रस्त्यावर होते पण फोन करून सुद्धा, ना डॉक्टर आले, ना नर्स? किती निर्दयी? उपचार केंद्राच्या अवघ्या एक किमीवर ही घटना घडते..
पोलीस वार्ता, चोपडा : चार मंत्री असलेल्या जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील बोरमळी येथून एक गर्भवती महिलेची घटना समोर आली गावातल्या बायकांनी रस्त्यावर केली डिलीवरी आणि दगडाने नाळ तोडली, काय आपली व्यवस्था? आजच्या युगात रुग्णालयाच्या सोई सुविधा उपलब्ध असलेल्या काळात एका गर्भवती महिलेचं रस्त्यावर बाळंतपण करावं लागलं आहे ही घटना महाराष्ट्रासारख्या राज्यासाठी काळीमा फासणारी आहे.
महिलेला रुग्णवाहिका न मिळाल्याने पतीने दुचाकीवर रुग्णालयात नेण्यासाठी आणले तेव्हा वैजापूर गावाजवळ प्राथमिक आरोग्य केंद्र एक किमी दूर असताना रस्त्यावरच गर्भवती महिलेचं बाळंतपण करावं लागलं तब्बल अडीच तास ती बाई व बाळ रस्त्यावर होते पण फोन करून सुद्धा, ना डॉक्टर आले, ना नर्स? किती निर्दयी? उपचार केंद्राच्या अवघ्या एक किमीवर ही घटना घडते तरी आणि रस्ते व्यवस्थित असलेल्या गावात ही दुर्दैवी घटना घडती आहे.
सरकार फक्त राज्याच्या प्रगतीच्या जाहिराती करण्यात व्यस्त आहे पण मुळात राज्याच्या सर्व भागात रुग्णालय व्यवस्था आणि उपचार सुविधा पोहचल्या आहे का? याचा काही तपास करत नाहीत. एकीकडे स्त्रियांना लाडक्या बहिणी मानून 1500 रूपये महिन्यांना दिले म्हणजे राज्य सरकारची जबाबदारी संपली का? राज्यातील आरोग्य सुविधा देणारी यंत्रणा नेमकी काय करतेय? कुठे गेल्या सरकारची रूग्णवाहिका? कुठे गेली प्राथमिक आरोग्य उपचार केंद्र? या झोपलेल्या आणि आळशी सरकारी यंत्रनेने अशा घटनांकडे गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे.
आजही राज्याच्या बऱ्याच भागात आरोग्य विभाग असून नसल्यासारखे आहे त्यात अतिदुर्गम व आदिवासी भागात आदिवासींच्या मुलभूत सोयी सुविधांकडे तर जातीने दूर्लक्ष होण्याची बाब वारंवार उघड होत असते. मात्र प्रशासनावर बसलेले लोकसेवक सोयिस्करपणे याकडे कानाडोळा करीत असतात. हे कुठपर्यंत चालेल? आणि याकडे कोण लक्ष देईल? हे प्रश्न आजही अनुत्तरित आहेत. फोन करूनही अॅम्ब्यूल्सन वेळेवर येत नाही मग अशा सुविधेचा फायदा काय? असा प्रश्न घडलेल्या घटनेवेळी जमलेल्या आदिवासी माता बहिणींनी पडला आहे.
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मिनल करनवाल यांनी चोपडा तालुक्यातील बोरमळी खैऱ्यापाणी (पाडा) या आदिवासी दुर्गम भागात जाऊन प्रसूती झालेल्या मातेस भेट देऊन आदिवासी बांधवांशी संवाद साधला.
कानूनी अधिकार, साइबर सुरक्षा व लैंगिक समानता पर जागरूकता
( गणेश सोलंकी ) छात्राओं को मिला मार्गदर्शन व आत्मविश्वास
खरगोन 16 अप्रैल 2026। “नारी शक्ति वंदन...
सातारा (मीनाक्षी पोळ उंब्रज) : कराड तालुक्यातील तासवडे एमआयडीसीतील भीषण स्फोट प्रकरणाला आता नवे वळण मिळाले असून, अमोल सुभाष कांबळे यांच्या तक्रारीनंतर उच्चस्तरीय चौकशीचे...
कानूनी अधिकार, साइबर सुरक्षा व लैंगिक समानता पर जागरूकता
( गणेश सोलंकी ) छात्राओं को मिला मार्गदर्शन व आत्मविश्वास
खरगोन 16 अप्रैल 2026। “नारी शक्ति वंदन...
सातारा (मीनाक्षी पोळ उंब्रज) : कराड तालुक्यातील तासवडे एमआयडीसीतील भीषण स्फोट प्रकरणाला आता नवे वळण मिळाले असून, अमोल सुभाष कांबळे यांच्या तक्रारीनंतर उच्चस्तरीय चौकशीचे...