भुसावळ – पोलीस वार्ता टीम ! विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे. विधानसभा -१२ (अ.जा) साठी महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ.राजेश मानवतकर हे निवडणुकीच्या रिंगणात पूर्ण ताकदीने उतरले असून त्यांची लढत अपक्ष उमेदवार स्वाती जंगले यांच्यासोबत आहे.भाजपा तिसऱ्या क्रमांकावर राहणार असल्याची माहिती माजी आमदार संतोष चौधरी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सविस्तर वृत्त असे की,वरणगांव रोडवरील हॉटेल राधाकृष्ण येथे सकाळी बारा वाजेला भुसावळ तालुक्यातील मुख्य कार्यकर्ते, पदाधिकारी यांची बैठक माजी आमदार संतोष चौधरी यांच्या उपस्थितीत संपन्न झाली.यावेळी माजी आमदार संतोष चौधरी यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधून त्यांचे विचार विनिमय तसेच भावना समजून घेतल्या.निवडणुकीमध्ये कार्यकर्ते हे महत्वाचे असतात त्या अनुषंगाने माजी आमदार संतोष चौधरी यांनी विधानसभा निवडणुकीमध्ये कुठल्या उमेदवाराला मतदान करणार याबाबत मते जाणून कार्यकत्यांचे मतदान घेण्यात आले.यावेळी कार्यकर्त्यांनी सर्वानुमते डॉ.राजेश मानवतकर यांच्या नावाची पसंती केली व पाठिंबा दिला.
भुसावळ तालुक्यातील उमेदवार निवडणूक आणण्यासाठी भुसावळ तालुकाचा ठरविल. विधानसभा निवडणुकीमध्ये भरगच्च मतांनी डॉ.राजेश मानवतकरांना निवडून आणण्यासाठी माजी आमदार संतोष चौधरी हे पूर्ण ताकदीने उशिरा का होईना रिंगणात उतरले आहे.आता पर्यंतचा इतिहास आहे माजी आमदार संतोष चौधरी यांनी ज्या उमेदराला साथ दिली तो आद्यपावतो सत्ता भोगत आहे.
” विनाशकालीन विपरीत बुद्धी असणाऱ्यांची बुद्धी भ्रष्ट झालेली असून मला लोकांची गरज नाही त्यांना माझी गरज आहे अशा गुर्मीत असणाऱ्याला त्यांची जागा दाखवण्याची योग्य ती वेळ आलेली आहे व जनता जनार्धन ते दाखवल्या शिवाय राहणार नाही हे नक्की ”
खरी लढाई महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉ.राजेश मानवतकर व अपक्ष उमेदवार स्वाती जंगले यांच्या मध्ये आहे. भाजपा भुसावळ विधानसभेत तिसऱ्या क्रमांकावर राहणार आहे.भुसावळ विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला जागा सुटल्याने एकमेकांना साथ देवून महाराष्ट्राला वाचवायचे आहे.यासाठी माजी आमदार संतोष चौधरी यांनी डॉ.राजेश मानवतकर यांना भुसावळ विधानसभेत निवडून आणण्याची संपूर्ण जबाबदारी जयेश संतोष चौधरी यांच्याकडे सोपविली आहे.
गेले पंधरा वर्षात विकास फक्त जवळच्या चांडाल चौकडीचा झालेला आहे.हे जनतेलाही चांगल्या प्रकारे ठाऊक आहे. महाराष्ट्रात परिस्थिती भाजप विरोधात आहे गुजरातच्या निवडणुकीमध्ये यांनी दंगली घडवल्या होत्या.काही गुजराती भुसावळातही आलेले आहे. निवडणुकी दरम्यान दंगली घडवण्याची शक्यता नाकारता येत नाही अशांवर लक्ष ठेवा. गुजराथी यांच्या नादी लागून महाराष्ट्राची वाट लावली आहे महाराष्ट्राला गुजराथी पासून वाचवायचे आहे.विविध योजनांचे प्रलोभनांना बळी न पडता योग्य तो उमेदवार निवडून द्यायचा आहे व परिवर्तन घडवायचे आहे.आता या उमेव्दाराना मतदार दाता जवाब विचारत आहेत त्यात तो फेल झाल्याने भुसावळ शहरा सह तालुक्यात ही विरोध होतांना दिसत आहे.काही भागात तर चक्क प्रचार रॅलीतून पळ ही काढला आहे.तर काही भागांमध्ये नागरीकांनी मतदानावर बहिष्कार केला आहे.
नागरीकांमध्ये संतांपाची लाट…
विकासाच्या नावाखाली भुसावळला भकासाच्या दिशेकडे पोहचवणाऱ्या तसेच अनेक परिवारांना रस्त्यावर आणणाऱ्या व बेरोजगारीचे प्रमाण वाढवण्याऱ्या विरुद्ध नागरीकांमध्ये संतांपाची लाट दिसत आहे. विधानसभेच्या निवडणुकीत फेल झालेल्या उमेदारांचे काही भागांमध्ये रात्रीच्या अंधाऱ्यांचा फायदा घेत बॅनर फाडण्यात आलेले आहे.


























